शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

अब्जाधीश पित्याचा मुलगा शिकतोय दुकानदारी

By admin | Published: July 23, 2016 5:38 AM

सहा हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असूनही त्यांनी आपल्या तरुण मुलाला सामान्य काम करण्यासाठी केरळात पाठविले आहे.

कोची : ते गुजरातमधील सूरत येथील हिऱ्याचे व्यापारी आहेत. सहा हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असूनही त्यांनी आपल्या तरुण मुलाला सामान्य काम करण्यासाठी केरळात पाठविले आहे. यामागचा उद्देश एवढाच आहे की, मुलाला दुकानदारी समजावी. गरीब लोक नोकरी आणि पैशांसाठी कसा संघर्ष करतात ते त्याला समजावे हाच यामागचा हेतू असल्याचे सावजी ढोलकिया सांगतात. हरे कृष्ण डायमंड एक्सपोर्ट या कंपनीची व्याप्ती ७१ देशांत आहे. सावजी यांचा मुलगा द्रव्या (२१) याने अमेरिकेतून एमबीए केले आहे. २१ जून रोजी द्रव्या हा केरळला रवाना झाला. त्याला खर्चासाठी वडिलांनी सात हजार रुपये दिले आणि अगदी गरज भासल्यासच ते पैसे खर्च करायचे सांगितले. याबाबत बोलताना सुरतमधील सावजी ढोलकिया म्हणाले की, माझ्या मुलाला मी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पैसे मिळविण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, एका ठिकाणी आठवड्यापेक्षा अधिक काळ काम करायचे नाही. आपल्या वडिलांची ओळख कुठे सांगायची नाही. मोबाईलचा वापर करायचा नाही. अनुभवाशिवाय कुठल्याही विद्यापीठात हे शिकायला मिळणार नाही. द्रव्याला नोकरीचे आलेले अनुभव त्याने सांगितले. या ठिकाणी त्याला कोणी ओळखत नव्हते. भाषेची अडचण होती. तब्बल ६० ठिकाणी त्याला रिजेक्ट करण्यात आले. नोकरी नाकारणे काय असते? आणि नोकरीची किंमत काय आहे? हे आपल्याला या काळात समजल्याचे त्याने सांगितले. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना अशा अनुभवांची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)>खाचखळगे अन् ठेचा...दोन दिवसांपूर्वीच घरी परतलेला द्रव्या आपल्या अनुभवाबाबत सांगतो की, आपण कॉल सेंटर, शूज शॉप आणि मॅकडोनाल्डच्या शॉपमध्येही काम केले. महिनाभरात चार हजारांची कमाई केली. येथे ४० रुपयांना मिळणाऱ्या जेवणास मी संघर्ष केला. तर लॉजवर राहण्यासाठी मला प्रति दिवस २५० रुपये लागत होते. एकूणच काय तर पैशांबाबत कधी फारसा विचार न करणारा द्रव्यासारखा तरूण या ठेचा खाउन खूप काही शिकला आहे.