शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवर भीषण अपघात, डबल डेकर बस दुधाच्या टँकरला धडकली; १८ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 08:29 IST

बिहारमधील सिवानमधून दिल्ली जाणाऱ्या डबल डेकर बसचा उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात १८ जण जागीच ठार झाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील उन्नावजवळ भीषण अपघात झाला आहे. आग्रा-लखनौ एक्सप्रेस वेवर टँकर आणि बसची धडक झाली आहे, या धडकेनंतर बस पलटली आहे. या घटनेत १८ जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात ३० जण गंभीर जखमी झाले आहेत.

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहाला अटक; मित्राने फोन चालू करताच सापडला

मिळालेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस (UP95 T 4720) बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जात होती. पहाटे साडेचार वाजता उन्नावमधील बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गधा गावासमोर बस आली असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुधाच्या टँकरने तिला ओव्हरटेक केले आणि यादरम्यान बसला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की डबल डेकर बस दोन ते तीनवेळा पलटी होऊन त्याचे दोन तुकडे झाले. या घटनेची माहिती मिळताच डीएम आणि एसपी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या अपघाताची माहिती माहिती इतर वाहनचालकांनी दिली. माहिती मिळताच बांगरमाऊचे निरीक्षक पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी बांगरमाळ सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी १८ जणांना मृत घोषित केले. गंभीर जखमी प्रवाशांना डॉक्टरांनी लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवले आहे. मृतांमध्ये १४ पुरुष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसापासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला होता. रात्री उशिरा झालेल्या या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर चार जण जखमी झाले.