शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Congress Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत फारुख अब्दुल्लांची एंट्री, म्हणाले- 'देशाची एकता राखणे काळाची गरज आहे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:55 IST

Congress Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा आज सकाळीच मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. बोदर्ली गावात पोहोचताच राहुल गांधी यांची आरती करण्यात आली.

Congress Bharat Jodo Yatra: कन्याकुमारीतून सुरू झालेली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' (Congress Bharat Jodo Yatra) जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे. ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) हेदेखील काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होणार आहेत. खुद्द फारुख अब्दुल्ला यांनीच ही माहिती दिली. देशाची एकता आणि अखंडता राखणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' सुरू केली आहे. सध्या ही यात्रा मध्य प्रदेशात असून, हळुहळू काश्मीरकडे जात आहे. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी मीडियाला सांगितले की, “लखनपूरपासून जम्मू-काश्मीर सुरू होते, यात्रा तिथे पोहोचल्यावर मी राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी होईल. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी आम्ही एकत्र येऊ. संघटित राहणे ही काळाची गरज आहे.” अब्दुल्ला सध्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत आहेत.

भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रा आज सकाळीच मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. बोदर्ली गावात पोहोचताच या यात्रेचे जल्लोषात व पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. गावात पोहोचल्यावर राहुल गांधी यांची आरती करण्यात आली. त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्याशिवाय इतर सर्व नेते राहुल गांधींच्या दौऱ्यात सोबत आहेत.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा