शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

“पाकिस्तानचे समर्थन नाही, विजय साजरा होणे भाजपसाठी इशारा”: फारुक अब्दुल्लांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 09:10 IST

विजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला एक स्पष्ट संदेश दिला आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देविजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला स्पष्ट संदेश दिलायजम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० परत करावाच लागेलआताच्या घडीला काश्मीर एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे धगधगत आहे

श्रीनगर: जागतिक टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानने केलेल्या भारताच्या पराभवानंतर जम्मू-काश्मीरमधील काही भागात मोठ्या प्रमाणात विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आता त्यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी उडी घेतली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला म्हणाले की, टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत काश्मीरमध्ये साजरा करण्यात आलेला विजय हा पाकिस्तानचे समर्थन करण्यासाठी नाही, तर भाजपला चिडवण्यासाठी होता. तसेच तो एक प्रकारे भाजपला इशाराही होता, असे सूचक विधान त्यांनी केले. 

केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केले. त्याचाच हा परिणाम आहे. आताच्या घडीला काश्मीर एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे धगधगत आहे. त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो, त्यानंतर याचे काय परिणाम होतील, हे सांगू शकत नाही, असेही फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पुँछ जिल्ह्यातील सुरनकोट येथील एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

भाजपला स्पष्ट संदेश दिला आहे

या विजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला एक स्पष्ट संदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० परत करावाच लागेल. केंद्रीय गृहमंत्री दावा करतात की, अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये एकही गोळी चाललेली नाही. घराबाहेर सैन्य उभे केल्यावर हे कसे शक्य होते, असा प्रश्न ते विचारू इच्छितात, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

दोन देशांमध्ये भारतातील हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ

भारत हा पाकिस्तानशी युद्ध झाल्यास त्याच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. बजेटमधील मोठा हिस्सा देत आहे. मात्र, दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे जम्मू-काश्मीरमधील लोकांचे सँडविच होत आहे. या दोन देशांतील संघर्षामुळे स्थानिक हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण होत आहे, असा दावा अब्दुल्ला यांनी यावेळी बोलताना केला. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काश्मीरमध्ये असताना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या विजयाचा आणि भारताच्या पराभवाचा जल्लोष साजरा होतो. हिंदुस्तानाविरोधात घोषणाबाजी होते, ही बाब चिंताजनक आहे. केंद्र सरकारनं या घटनेची नोंद गांभीर्यानं घ्यायला हवी, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून केली होती.  

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाPakistanपाकिस्तानT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर