शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

“पाकिस्तानचे समर्थन नाही, विजय साजरा होणे भाजपसाठी इशारा”: फारुक अब्दुल्लांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 09:10 IST

विजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला एक स्पष्ट संदेश दिला आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देविजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला स्पष्ट संदेश दिलायजम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० परत करावाच लागेलआताच्या घडीला काश्मीर एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे धगधगत आहे

श्रीनगर: जागतिक टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानने केलेल्या भारताच्या पराभवानंतर जम्मू-काश्मीरमधील काही भागात मोठ्या प्रमाणात विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आता त्यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी उडी घेतली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला म्हणाले की, टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत काश्मीरमध्ये साजरा करण्यात आलेला विजय हा पाकिस्तानचे समर्थन करण्यासाठी नाही, तर भाजपला चिडवण्यासाठी होता. तसेच तो एक प्रकारे भाजपला इशाराही होता, असे सूचक विधान त्यांनी केले. 

केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केले. त्याचाच हा परिणाम आहे. आताच्या घडीला काश्मीर एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे धगधगत आहे. त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो, त्यानंतर याचे काय परिणाम होतील, हे सांगू शकत नाही, असेही फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पुँछ जिल्ह्यातील सुरनकोट येथील एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

भाजपला स्पष्ट संदेश दिला आहे

या विजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला एक स्पष्ट संदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० परत करावाच लागेल. केंद्रीय गृहमंत्री दावा करतात की, अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये एकही गोळी चाललेली नाही. घराबाहेर सैन्य उभे केल्यावर हे कसे शक्य होते, असा प्रश्न ते विचारू इच्छितात, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

दोन देशांमध्ये भारतातील हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ

भारत हा पाकिस्तानशी युद्ध झाल्यास त्याच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. बजेटमधील मोठा हिस्सा देत आहे. मात्र, दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे जम्मू-काश्मीरमधील लोकांचे सँडविच होत आहे. या दोन देशांतील संघर्षामुळे स्थानिक हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण होत आहे, असा दावा अब्दुल्ला यांनी यावेळी बोलताना केला. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काश्मीरमध्ये असताना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या विजयाचा आणि भारताच्या पराभवाचा जल्लोष साजरा होतो. हिंदुस्तानाविरोधात घोषणाबाजी होते, ही बाब चिंताजनक आहे. केंद्र सरकारनं या घटनेची नोंद गांभीर्यानं घ्यायला हवी, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून केली होती.  

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाPakistanपाकिस्तानT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर