शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

फारुख अब्दुल्ला म्हणतात, आम्ही भारतीयच! पण...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 15:29 IST

काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 35 अ आणि कलम 370 बाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली - काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 35 अ आणि कलम 370 बाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीयच आहोत, मात्र कलम 35 अ आणि कलम 370 हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे. आज संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, कलम 35 अ, कलम 370 हे हटवता कामा नये. या कलमांवरच आमचा पाया टिकून आहे. त्यांना हटवण्याची गरज नाही. आम्ही भारतीयच आहोत. मात्र कलम 35 अ, कलम 370 हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. 

केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात लष्कराचे दहा हजार जवान तैनात करण्याचा निर्णय घेतल्याने काश्मीर आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकार काश्मीरबाबतच्या कलम 35 अ आणि कलम 370 बाबत मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.  केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात केले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डोवाल यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाIndiaभारत