शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

फारुख अब्दुल्ला म्हणतात, आम्ही भारतीयच! पण...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 15:29 IST

काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 35 अ आणि कलम 370 बाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली - काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 35 अ आणि कलम 370 बाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीयच आहोत, मात्र कलम 35 अ आणि कलम 370 हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे. आज संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, कलम 35 अ, कलम 370 हे हटवता कामा नये. या कलमांवरच आमचा पाया टिकून आहे. त्यांना हटवण्याची गरज नाही. आम्ही भारतीयच आहोत. मात्र कलम 35 अ, कलम 370 हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. 

केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात लष्कराचे दहा हजार जवान तैनात करण्याचा निर्णय घेतल्याने काश्मीर आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकार काश्मीरबाबतच्या कलम 35 अ आणि कलम 370 बाबत मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.  केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात केले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डोवाल यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाIndiaभारत