शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपटणार; केंद्र सरकारपुढे दुहेरी अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 02:23 IST

नव्याने चर्चा करण्याची मागणी, कृषि कायदे ज्या प्रकारे केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २०१९ मध्ये मंजूर केली, त्याचप्रमाणे कामगार संहिता मंजूर केल्या 

हरीश गुप्तानवी दिल्ली : दोन महिन्यांपासून दिल्ली सीमेवर चालू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी एकीकडे पंतप्रधान कार्यालय संबंधित मंत्रालयासोबत उसंत न घेता काम करीत असताना देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी चार कामगार संहितांच्या अमलबजावणीविरुद्ध जोरदार आवाज उठविला आहे.

शेतकरी आंदोलनामुळे सरकारच्या अन्य प्रमुख सुधारणांना खीळ बसते की काय? अशी स्थिती उद्‌भवलेली असताना १३ पैकी १० प्रमुख कामगार संघटनांनी चार कामगार संहिता लागू करण्यासाठी नवीन नियम निश्चित करण्याची प्रक्रिया रोखण्याची आणि द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय सल्लामसलतीच्या भावानेतून नव्याने चर्चा करण्याची मागणी केली आहे. इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सीटू, एआययूटीयूसीसह दहा कामगार संघटनांनी उपरोक्त मागणी केली आहे. केंद्रीय कामगार संघटनांशी कोणतीही चर्चा न करता या कामगार संहिता संसदेत मंजूर करण्यात आल्या, असा कामगार संघटनांचा आरोप आहे. या संहिता ५० कोटी श्रमशक्तींशी (कामगार, कर्मचारी) संबंधित आहेत.

कृषि कायदे ज्या प्रकारे केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २०१९ मध्ये मंजूर केली, त्याचप्रमाणे कामगार संहिता मंजूर केल्या; परंतु, कामगार संघटना आणि सर्वसंबंधितांशी चर्चा करुन कामगार मंत्रालयाने नियम केल्यानंतरच कामगार संहितांची अमलबजावणी केली जाईल, अशी हमी देत सरकारने पेचप्रसंग टाळण्याचा प्रयत्न केला होता.  विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित भारतीय मजदूर संघाने केंद्रीय कामगार मंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन कंत्राटी कामगारांचे रक्षण करण्याची मागणी केली. कामगार संहितेतून ठेकेदारांना राज्य कामगार विमा आणि कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास बाध्य करावे. या संघटनेचाही चार कामगार संहितेमधील अनेक तरतुदींना विरोध आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी कामगार संहिता अमलबजावणीची तारीख ठरविणे लांबणीवर टाकले आहे.

कामगार संहितेचा प्रवास जानेवारी २०२१ : कामगार मंत्रालय चालू महिन्याच्या अखेरीस कामगार संहितेनुसार नियम अंतिम करणार२०१९ : औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थितीसंबंधित चार कामगार संहिता मंजूर२०१५ : कामगार मंत्रालयाने सध्याचे ४४ केंद्रीय कामगार कायदे चार संहितेत एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. नवीन कामगार संहिता मंजूर करण्यासाठी चार वर्षे लागली. 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारLabourकामगार