शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

शेतक-यांना माल फेकावा लागणार नाही, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभूंना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:09 IST

महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही शेतकºयाला त्याचे उत्पादन यापुढे रस्त्यावर फेकायची वेळ येणार नाही, अशी आशा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही शेतकºयाला त्याचे उत्पादन यापुढे रस्त्यावर फेकायची वेळ येणार नाही, अशी आशा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना आहे. सरकार शेतकºयांना त्यांच्या उत्पादनाला आलेला खर्च द्यायला आणि त्यांना त्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवण्यासाठीच्या कृषी निर्यात धोरणावर काम करीत आहे. या विषयाशी संबंधित सगळे घटक आणि जनतेशी लवकरच चर्चा केली जाईल, असे प्रभू म्हणाले.गे्रटर नोएडामध्ये एक्स्पोर्ट मार्टमध्ये सुरू झालेल्या दोन दिवसांच्या इंडस फूड नावाच्या शिखर परिषदेच्या उद््घाटनादरम्यान प्रभू ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, या परिषदेत ४३ देशांचे ४०८ प्रतिनिधी सहभागी आहेत. ट्रेड प्रमोशन कौन्सिल आॅफ इंडिया -वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित या परिषदेत भारतीय खरेदीदारांशी आंतरराष्ट्रीय रिटेल चेन आणि प्रतिनिधी उत्पादन खरेदीसाठी थेट बोलू शकतील. प्रभू यांना वाटते की, इंडस फूड आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची परिषद व्हावी. ही पहिलीच वेळ आहे की, जेथे शेतकरी, उत्पादक आणि भारतीय व्यापारी विदेशात न जाता आंतरराष्ट्रीय रिटेल चेन आणि इतर कंपन्यांशी थेट व्यवहार-चर्चा करू शकतात. हे कौतुकास्पद पाऊल आहे. नव्या कृषी निर्यात धोरणाचा विचार केला, तर वस्तुस्थिती बदलेल. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट होईल असे नाही, तर आपल्या उत्पादनाला जो जास्त भाव देईल त्याला ते विकण्याचा पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध असेल.याचबरोबर विदेशांत खाद्यान्नाचे वेगवेगळे प्रकार निर्यात करण्यासाठीही पावले उचलली जात आहेत.त्यात नागपूर विमानतळावरून जिवंत मेंढ्या-शेळ्या सौदी अरेबियात पाठवण्यासोबत नागपूरची संत्री आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या माध्यमातून स्वस्त दरांनी जगात पोहोचवणेही समाविष्ट आहे. असाच प्रयोग पूर्वोत्तर भारतासाठीही केला जात आहे. दक्षिण भारतातील सागरी भोजन व उत्तर भारतातून गहू व तांदळाची निर्यात वाढवण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असेही प्रभू म्हणाले.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूFarmerशेतकरी