शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची यंदा दिवाळी असेल काळी; दिल्लीच्या सीमेवर येण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:37 IST

केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी यंदा ‘काळी दिवाळी’ साजरी करू असा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे.

- विकास झाडेनवी दिल्ली : येत्या २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ११ महिने पूर्ण होत आहेत. या निमित्ताने दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे संयुक्त किसान मोर्चाने आवाहन केले आहे. शिवाय केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी यंदा ‘काळी दिवाळी’ साजरी करू असा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. डिसेंबर व जानेवारीमध्ये केंद्र सरकारच्या मंत्रिगटाने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. पण त्यातून तोडगा निघाला नाही. पुढे प्रजासत्ताक दिनी काही शेतकरी लाल किल्ल्यात घुसल्यानंतर वातावरण बिघडले आणि सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याच्या निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणारदेशभरातील शेतकऱ्यांना कृषी कायद्याविरोधात ऑक्टोबरअखेरपर्यंत राजधानी दिल्लीच्या सीमेवर एकत्रित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाची दिवाळी आमच्यासाठी काळी असेल, असे सांगून, या निमित्ताने सरकारचे लक्ष वेधणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. निहंग शीख आंदोलकांसंबंधी संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, निहंग शीख हे आंदोलनाला समर्थन देणारा एक वर्ग होता. पण आम्हाला कोणताही हिंसाचार मान्य नाही. आंदोलन उधळण्याचा डाव सरकारकडून सातत्याने होत आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन