शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

शेतकऱ्यांची यंदा दिवाळी असेल काळी; दिल्लीच्या सीमेवर येण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:37 IST

केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी यंदा ‘काळी दिवाळी’ साजरी करू असा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे.

- विकास झाडेनवी दिल्ली : येत्या २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ११ महिने पूर्ण होत आहेत. या निमित्ताने दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे संयुक्त किसान मोर्चाने आवाहन केले आहे. शिवाय केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी यंदा ‘काळी दिवाळी’ साजरी करू असा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. डिसेंबर व जानेवारीमध्ये केंद्र सरकारच्या मंत्रिगटाने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. पण त्यातून तोडगा निघाला नाही. पुढे प्रजासत्ताक दिनी काही शेतकरी लाल किल्ल्यात घुसल्यानंतर वातावरण बिघडले आणि सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याच्या निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणारदेशभरातील शेतकऱ्यांना कृषी कायद्याविरोधात ऑक्टोबरअखेरपर्यंत राजधानी दिल्लीच्या सीमेवर एकत्रित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाची दिवाळी आमच्यासाठी काळी असेल, असे सांगून, या निमित्ताने सरकारचे लक्ष वेधणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. निहंग शीख आंदोलकांसंबंधी संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, निहंग शीख हे आंदोलनाला समर्थन देणारा एक वर्ग होता. पण आम्हाला कोणताही हिंसाचार मान्य नाही. आंदोलन उधळण्याचा डाव सरकारकडून सातत्याने होत आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन