शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

शेतकऱ्यांची यंदा दिवाळी असेल काळी; दिल्लीच्या सीमेवर येण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:37 IST

केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी यंदा ‘काळी दिवाळी’ साजरी करू असा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे.

- विकास झाडेनवी दिल्ली : येत्या २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ११ महिने पूर्ण होत आहेत. या निमित्ताने दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे संयुक्त किसान मोर्चाने आवाहन केले आहे. शिवाय केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी यंदा ‘काळी दिवाळी’ साजरी करू असा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. डिसेंबर व जानेवारीमध्ये केंद्र सरकारच्या मंत्रिगटाने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. पण त्यातून तोडगा निघाला नाही. पुढे प्रजासत्ताक दिनी काही शेतकरी लाल किल्ल्यात घुसल्यानंतर वातावरण बिघडले आणि सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याच्या निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणारदेशभरातील शेतकऱ्यांना कृषी कायद्याविरोधात ऑक्टोबरअखेरपर्यंत राजधानी दिल्लीच्या सीमेवर एकत्रित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाची दिवाळी आमच्यासाठी काळी असेल, असे सांगून, या निमित्ताने सरकारचे लक्ष वेधणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. निहंग शीख आंदोलकांसंबंधी संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, निहंग शीख हे आंदोलनाला समर्थन देणारा एक वर्ग होता. पण आम्हाला कोणताही हिंसाचार मान्य नाही. आंदोलन उधळण्याचा डाव सरकारकडून सातत्याने होत आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन