शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे अनुदानासाठी साकडे शेतकरी उद्ध्वस्त : पंचनामे करूनही दमडीही नाही

By admin | Updated: July 11, 2015 00:31 IST

नाशिक : सटाणा तालुक्यातील धांद्री येथे नोव्हेंबर ते मार्च पाच महिने सलग गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले परंतु शासकीय मदतीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याने शुक्रवारी शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. विशेष म्हणजे मार्च महिन्यात गारपिटीत प्रचंड नुकसान झालेले असताना शासनाने अनुदानाची पूर्ण रक्कमच अद्याप शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिलेली नाही.

नाशिक : सटाणा तालुक्यातील धांद्री येथे नोव्हेंबर ते मार्च पाच महिने सलग गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले परंतु शासकीय मदतीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याने शुक्रवारी शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. विशेष म्हणजे मार्च महिन्यात गारपिटीत प्रचंड नुकसान झालेले असताना शासनाने अनुदानाची पूर्ण रक्कमच अद्याप शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिलेली नाही. या संदर्भात शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर व डिसेंबर २०१४ मध्ये धांद्री व परिसरातील गावांमध्ये प्रचंड गारपीट होऊन खरिपाची पिके नष्ट झाली, तर जे काही बचावले त्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले व त्यानंतर शासनाने गारपीटग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप केले. या मदतीवर शेतकरी थोडा उभा राहिला व पुन्हा त्याने पिके घेण्यास सुरुवात करताच, मार्चमध्ये पुन्हा गारपीट झाली. त्यावेळी सर्व पिके हातची गेली. वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या घरांची पडझड होऊन मोठे नुकसान सोसावे लागले. शासनाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्यावर पंचनामेही करण्यात आले. परंतु शासनाने ज्यांना नोव्हेंबर महिन्यात अनुदान दिले त्यांना मार्चमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ज्या शेतकर्‍यांचे पंचनामे झाले आहेत तसेच ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करून लगतच्या गावातील शेतकर्‍यांना मात्र नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली, पण आम्हाला नाही अशी तक्रारही त्यांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांना निवेदन देण्यात आले, प्रसंगी गजेंद्र चव्हाण, बहिणाजी धोंडू चव्हाण, सुरेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, पोपट चव्हाण, अशोक देवरे, विश्वास चव्हाण, बाळू चव्हाण, सुदाम पवार आदि उपस्थित होते.