शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे अनुदानासाठी साकडे शेतकरी उद्ध्वस्त : पंचनामे करूनही दमडीही नाही

By admin | Updated: July 11, 2015 00:31 IST

नाशिक : सटाणा तालुक्यातील धांद्री येथे नोव्हेंबर ते मार्च पाच महिने सलग गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले परंतु शासकीय मदतीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याने शुक्रवारी शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. विशेष म्हणजे मार्च महिन्यात गारपिटीत प्रचंड नुकसान झालेले असताना शासनाने अनुदानाची पूर्ण रक्कमच अद्याप शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिलेली नाही.

नाशिक : सटाणा तालुक्यातील धांद्री येथे नोव्हेंबर ते मार्च पाच महिने सलग गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले परंतु शासकीय मदतीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याने शुक्रवारी शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. विशेष म्हणजे मार्च महिन्यात गारपिटीत प्रचंड नुकसान झालेले असताना शासनाने अनुदानाची पूर्ण रक्कमच अद्याप शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिलेली नाही. या संदर्भात शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर व डिसेंबर २०१४ मध्ये धांद्री व परिसरातील गावांमध्ये प्रचंड गारपीट होऊन खरिपाची पिके नष्ट झाली, तर जे काही बचावले त्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले व त्यानंतर शासनाने गारपीटग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप केले. या मदतीवर शेतकरी थोडा उभा राहिला व पुन्हा त्याने पिके घेण्यास सुरुवात करताच, मार्चमध्ये पुन्हा गारपीट झाली. त्यावेळी सर्व पिके हातची गेली. वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या घरांची पडझड होऊन मोठे नुकसान सोसावे लागले. शासनाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्यावर पंचनामेही करण्यात आले. परंतु शासनाने ज्यांना नोव्हेंबर महिन्यात अनुदान दिले त्यांना मार्चमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ज्या शेतकर्‍यांचे पंचनामे झाले आहेत तसेच ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करून लगतच्या गावातील शेतकर्‍यांना मात्र नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली, पण आम्हाला नाही अशी तक्रारही त्यांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांना निवेदन देण्यात आले, प्रसंगी गजेंद्र चव्हाण, बहिणाजी धोंडू चव्हाण, सुरेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, पोपट चव्हाण, अशोक देवरे, विश्वास चव्हाण, बाळू चव्हाण, सुदाम पवार आदि उपस्थित होते.