शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गाझीपूर सीमेवर पोहोचले शेतकरी, हरियाणाच्या सर्वात मोठ्या शेतकरी संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 17:25 IST

विविध मागण्यासांठी शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.

Farmer Protest: एमएसपीसह विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. हरियाणा-पंजाब सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा आणि यूपीच्या सीमेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी सरकारने अनेकदा चर्चा केली, पण ती निष्फळ ठरली.

दरम्यान, गुरुवारी पहिल्यांदाच यूपीचे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघाले, मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवून बसमध्ये बसवले. हे शेतकरी गॅस सिलिंडर आणि रेशन घेऊन यूपीमधील गाझियाबादहून गाझीपूर सीमेवर पोहोचले होते. पोलिसांनी कायदेशीर कारवाईनंतर त्या शेतकऱ्यांना सोडून दिले.

बीकेयू चाधुनी यांचा आंदोलनाला पाठिंबा हरियाणातील सर्वात मोठी शेतकरी संघटना भारतीय किसान युनियन (चाधुनी) ने या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, संघटना शंभू सीमेपर्यंत मोर्चा काढणार नाही. संघटनेच्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी हरियाणातील सर्व टोलनाके मोफत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हरियाणातील सर्व टोलनाके दुपारी 12 ते 3 या वेळेत मोफत असतील. 17 फेब्रुवारी रोजी जिल्हा मुख्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल. 18 फेब्रुवारी रोजी कुरुक्षेत्र येथे बैठक घेऊन सर्व शेतकरी संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या 1. सर्व पिकांच्या खरेदीसाठी एमएसपी हमी कायदा करण्यात यावा.2. डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांचे भाव ठरवावेत.3. शेतकरी आणि शेतमजुरांचे कर्ज माफ करावे. 4. 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन देण्यात यावी.5. भूसंपादन कायदा 2013 पुन्हा लागू करावा.6. लखीमपूर खेरी घटनेतील दोषींना शिक्षा झाली पाहिजे.7. मुक्त व्यापार करारांवर बंदी घालावी.8. वीज दुरुस्ती विधेयक 2020 रद्द करण्यात यावे.9. मनरेगा अंतर्गत दरवर्षी 200 दिवसांचे काम आणि 700 रुपये मजुरी देण्यात यावी.10. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि सरकारी नोकऱ्या द्याव्यात. 11. बनावट बियाणे, कीटकनाशके आणि खते विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कायदे करावेत. 12. मिरची, हळद आणि इतर मसाल्यांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करावी.13. संविधानाची 5वी अनुसूची लागू करून आदिवासींच्या जमिनींची लूट थांबवावी.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीBJPभाजपाPunjabपंजाबHaryanaहरयाणा