शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:41 IST

शेतकरी आंदाेलनावर केली फेसबुक पाेस्ट

भाेपाळ : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विराेधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदाेलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रघुनंदन शर्मा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांच्यावर टीका केली आहे. सत्ता डाेक्यात गेल्याची टीका शर्मा यांनी केली असून, देश बळकट करण्याच्या दिशेने काम करण्याचा सल्लाही त्यांनी ताेमर यांना दिला आहे.शर्मा यांनी फेसबुकवर एक पाेस्ट टाकली असून, त्यातून त्यांनी ताेमर यांच्या कार्यशैलीवर जाेरदार टीकास्त्र साेडले आहे. त्यांनी ताेमर यांना उद्देशून लिहिले की, तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात. शेतकऱ्यांना मदत करण्याचा तुमचा हेतू असायला हवा. मात्र, तसे हाेताना दिसत नाही. त्यांना तुमची मदत नकाे असल्यास हा चांगुलपणा काय कामाचा? त्यांना तसेच राहायचे असेल तर बळजबरी करून काय उपयाेग हाेणार आहे. आज सत्ता तुमच्या डाेक्यात गेली आहे. तुम्ही जनाधार का गमावत आहात? काॅँग्रेसची धाेरणे आपण राबवत असून, ते आपल्या हिताचे नाही, असे खडे बाेल शर्मा यांनी सुनावले आहेत. राष्ट्रीयत्व बळकट करण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न करा अन्यथा आपल्याला पश्चाताप करावा लागेल. तुम्ही तुमच्या यशाची फळे चाखत आहात, असे वाटत असेल तुम्ही चुकत आहात. शेतकऱ्यांना  शांततेत निदर्शने करू द्यावीतवॉशिंग्टन : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना मोदी सरकारने शांततापूर्ण निदर्शने करू द्यावीत, त्यांना आंदोलनस्थळी इंटरनेटही उपलब्ध असावे, असे अमेरिकी काँग्रेसच्या भारतविषयक समितीने म्हटले आहे.भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अमेरिकी काँग्रेसच्या भारतविषयक समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. अमेरिकी काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेर्मन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी स्टीव्ह चॅबॉट तसेच अमेरिकी काँग्रेस सदस्य आर. ओ. खन्ना हे उपस्थित होते. हक्कांची गळचेपी नको : संयुक्त राष्ट्रेनव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा हक्क शेतकऱ्यांना बजावू द्यावा, त्यांच्या मानवी हक्कांची गळचेपी करू नये असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कविषयक विभागाने भारताला सांगितले आहे. शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येकाचा व शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ