शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या भारत बंदचा पंजाब, हरयाणात प्रभाव; अन्यत्र संमिश्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:13 IST

सामान्य व्यवहारांपासून तर मोठ्या मंडई बंद ठेवण्यात आल्या. दिल्लीच्या सीमांवर रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी रोखले,

विकास झाडेनवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. हरयाणपंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत या बंदचा प्रभाव दिसून आला. दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी १२० दिवस पूर्ण झाले. तिन्ही कृषी कायदे रद्द करा, मालास किमान आधारभूत किंमत द्या, आंदोलक शेतकऱ्यांवरचे सर्व खटले रद्द करा, डिझेल, पेट्रोल आणि गॅसदर कमी करा आदी मागण्या आज शेतकऱ्यांनी केल्या.

सामान्य व्यवहारांपासून तर मोठ्या मंडई बंद ठेवण्यात आल्या. दिल्लीच्या सीमांवर रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी रोखले, त्यामुळे लोकांची गैरसोय झाली. ओखला, गाझीपूर आणि आझादपूरच्या भाजी मंडई बंद ठेवण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच गाझीपूरचे रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी बंद केले. गाझीपूर, टिकरी आणि सिंधू सीमेवर शेतकऱ्यांनी निषेध व घोषणाबाजी केली. अनेक ठिकाणी नृत्य आणि गाण्याने वातावरण निर्मिती करण्यात आली. आजच्या भारत बंदची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यात सर्वसामान्यांचा खूप सहभाग होता. 

बिहारमध्ये २० जिल्ह्यांत आंदोलनाची तीव्रता काही ठिकाणी मात्र शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅक अडवला. शेतकरी नेते युद्धवीर सिंग यांना गुजरात येथे पोलिसांनी अटक केली. बिहारमध्ये २० जिल्ह्यांमध्ये भारत बंद आंदोलनाची तीव्रता होती. पंजाबमध्ये २०० पेक्षा अधिक ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने केली. राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेशातही शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेशात आंदोलनाची तीव्रता नव्हती.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन