शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या भारत बंदचा पंजाब, हरयाणात प्रभाव; अन्यत्र संमिश्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:13 IST

सामान्य व्यवहारांपासून तर मोठ्या मंडई बंद ठेवण्यात आल्या. दिल्लीच्या सीमांवर रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी रोखले,

विकास झाडेनवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. हरयाणपंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत या बंदचा प्रभाव दिसून आला. दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी १२० दिवस पूर्ण झाले. तिन्ही कृषी कायदे रद्द करा, मालास किमान आधारभूत किंमत द्या, आंदोलक शेतकऱ्यांवरचे सर्व खटले रद्द करा, डिझेल, पेट्रोल आणि गॅसदर कमी करा आदी मागण्या आज शेतकऱ्यांनी केल्या.

सामान्य व्यवहारांपासून तर मोठ्या मंडई बंद ठेवण्यात आल्या. दिल्लीच्या सीमांवर रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी रोखले, त्यामुळे लोकांची गैरसोय झाली. ओखला, गाझीपूर आणि आझादपूरच्या भाजी मंडई बंद ठेवण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच गाझीपूरचे रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी बंद केले. गाझीपूर, टिकरी आणि सिंधू सीमेवर शेतकऱ्यांनी निषेध व घोषणाबाजी केली. अनेक ठिकाणी नृत्य आणि गाण्याने वातावरण निर्मिती करण्यात आली. आजच्या भारत बंदची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यात सर्वसामान्यांचा खूप सहभाग होता. 

बिहारमध्ये २० जिल्ह्यांत आंदोलनाची तीव्रता काही ठिकाणी मात्र शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅक अडवला. शेतकरी नेते युद्धवीर सिंग यांना गुजरात येथे पोलिसांनी अटक केली. बिहारमध्ये २० जिल्ह्यांमध्ये भारत बंद आंदोलनाची तीव्रता होती. पंजाबमध्ये २०० पेक्षा अधिक ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने केली. राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेशातही शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेशात आंदोलनाची तीव्रता नव्हती.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन