शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
3
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
4
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
5
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
6
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
7
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
8
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
9
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
10
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
11
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
12
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
13
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
14
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
15
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
16
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
17
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
18
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
19
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
20
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
Daily Top 2Weekly Top 5

Rakesh Tikait : "शेतकऱ्यांवर अन्याय झालाच तर..."; राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला दिला 'हा' इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 15:42 IST

Rakesh Tikait And Farmers Protest : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने केलेल्या व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान भारतीय किसान युनियन (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात मोठ्या भांडवलदार कंपन्या आहेत, ज्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी हा देश ताब्यात घेतला आहे. अशा परिस्थितीत समस्या निर्माण होतील असं टिकैत यांनी म्हटलं आहे. जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल आणि सरकार त्यांच्यासाठी काही समस्या निर्माण करत असेल तर ते शेतकरी आमच्यापासून दूर नाहीत आणि दिल्लीही आमच्यापासून दूर नाही असंही म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सध्या भारतीय किसान युनियनचा सहभाग नाही. याबाबत भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, "किसान युनियनने हा मोर्चा काढला आहे. या संघटनांनी पूर्वीच्या आंदोलनात स्वत:ला दूर ठेवले होते. यापैकी एकाही संघटनेने आमच्याशी संपर्कही साधला नाही. सर्वजण आपापल्या परीने कार्यक्रम करत आहेत. योग्य पद्धतीने केलं जात आहे."

"सरकार जे काही करत आहे ते चुकीचं आहे. चर्चेने प्रश्न सोडवला पाहिजे. सरकारने खिळे वगैरे वापरू नयेत. आपला 16 फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंद आहे. त्यांना काही अडचण आली तर आम्हीही सक्रिय होऊ. शेतकऱ्यांना काही समस्या असेल तर आम्ही दिल्लीपर्यंत कूच करू. देशात अनेक संघटना आहेत. शेतकरी सीमेवर थांबवले जाऊ नये. त्यांना येऊ द्या. प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे."

नरेश टिकैत यांनीही शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारच्या व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एबीपी लाइव्हशी बोलताना ते म्हणाले, "वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. पण शेतकरी कायमच आंदोलन करणार का, ते नेहमीच दिल्लीकडे कूच करतील का? सरकारने याकडे लक्ष द्यावं. यामुळे कोणाचंच भलं होणार नाही." 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदी