शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Rakesh Tikait : "शेतकऱ्यांवर अन्याय झालाच तर..."; राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला दिला 'हा' इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 15:42 IST

Rakesh Tikait And Farmers Protest : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने केलेल्या व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान भारतीय किसान युनियन (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात मोठ्या भांडवलदार कंपन्या आहेत, ज्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी हा देश ताब्यात घेतला आहे. अशा परिस्थितीत समस्या निर्माण होतील असं टिकैत यांनी म्हटलं आहे. जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल आणि सरकार त्यांच्यासाठी काही समस्या निर्माण करत असेल तर ते शेतकरी आमच्यापासून दूर नाहीत आणि दिल्लीही आमच्यापासून दूर नाही असंही म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सध्या भारतीय किसान युनियनचा सहभाग नाही. याबाबत भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, "किसान युनियनने हा मोर्चा काढला आहे. या संघटनांनी पूर्वीच्या आंदोलनात स्वत:ला दूर ठेवले होते. यापैकी एकाही संघटनेने आमच्याशी संपर्कही साधला नाही. सर्वजण आपापल्या परीने कार्यक्रम करत आहेत. योग्य पद्धतीने केलं जात आहे."

"सरकार जे काही करत आहे ते चुकीचं आहे. चर्चेने प्रश्न सोडवला पाहिजे. सरकारने खिळे वगैरे वापरू नयेत. आपला 16 फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंद आहे. त्यांना काही अडचण आली तर आम्हीही सक्रिय होऊ. शेतकऱ्यांना काही समस्या असेल तर आम्ही दिल्लीपर्यंत कूच करू. देशात अनेक संघटना आहेत. शेतकरी सीमेवर थांबवले जाऊ नये. त्यांना येऊ द्या. प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे."

नरेश टिकैत यांनीही शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारच्या व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एबीपी लाइव्हशी बोलताना ते म्हणाले, "वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. पण शेतकरी कायमच आंदोलन करणार का, ते नेहमीच दिल्लीकडे कूच करतील का? सरकारने याकडे लक्ष द्यावं. यामुळे कोणाचंच भलं होणार नाही." 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदी