शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

Farmers Protest: कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा उद्या भारत बंद; देशवासियांनी सहभागी होण्याचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 08:10 IST

केंद्र सरकाने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपी लागू करावा, यासाठी आंदोलन सुरू आहे.

नवी दिल्ली : २६  मार्च रोजी  संपूर्ण भारतबंद यशस्वी करावा, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला १२० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत बंद पुकारण्यात आला आहे. 

केंद्र सरकाने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपी लागू करावा, यासाठी आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोर्चाचे  डॉ. दर्शन पाल यांनी सांगितले की,  सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत देशभरातील सर्व रस्ते आणि रेल्वे वाहतूक, सर्व बाजारपेठा आणि इतर सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. तथापि, ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी बंदची गरज नाही. हा भारत बंद यशस्वी करून देशवासीयांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करावा. 

श्री फतेहगड साहिब येथे किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. ज्यात पंजाबच्या शेतकरी संघटना आणि धार्मिक संघटनांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. डॉ. पाल म्हणाले की, शिवमोगामध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याविरोधात बेकायदेशीर एफआयआर दाखल करण्यात आली असून, त्याचा आम्ही निषेध करतो.  संयुक्त किसान मोर्चा बिहार विधानसभेत विरोधी सदस्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विरोधकांचा आवाज दाबून त्यांची बदनामी केली आहे.  दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांनी  हुतात्मा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन