शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये MSP साठी शेतकऱ्यांचे आंदोलन; दिल्ली हायवे रोखला, पोलीस तैनात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:55 IST

महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले असून, पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.

Farmers Protest: पिकांची किमान आधारभूत किंमत(MSP) ठरवावी या मागणीसाठी कुरुक्षेत्रात शेतकरी नेते आणि प्रशासकीय अधिकारी, यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पिपली गावात आयोजित 'महापंचायत'मध्ये शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 रोखण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शेतकऱ्यांनी दिल्लीला जाणारा राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे. गर्दी टाळण्यासाठी दिल्ली-चंदीगड मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

हरियाणातील शेतकरी सूर्यफूल पिकाच्या खरेदीत किमान आधारभूत किंमत ठरवण्याची मागणी कर आहेत. एमएसपीच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने सुरू आहेत. हरियाणा, पंजाब, यूपी आणि इतर शेजारील राज्यांतील शेतकरी नेते त्यांच्या मागणीसाठी 'एमएसपी दिलाओ, किसान बचाओ' महापंचायतीसाठी पिपली धान्य मार्केटमध्ये जमले होते. यावेळी चर्चा निष्फळ ठरल्यामुळे शेतकरी कुरुक्षेत्रहून दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत.

शेतकऱ्यांची मागणी काय?मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शनिवारी 8,528 शेतकऱ्यांना भावांतर भरपाई योजनेअंतर्गत (BBY) 36,414 एकर क्षेत्रात घेतलेल्या सूर्यफूल पिकासाठी 29.13 कोटी रुपये वितरित केले. राज्य सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला बीबीवाय अंतर्गत सूर्यफूल पिकाचा समावेश करण्याची घोषणा केली होती. ही एक अशी योजना आहे, ज्याद्वारे सरकार MSP खाली विकल्या गेलेल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना निश्चित नुकसान भरपाई देते. एमएसपीपेक्षा कमी विकल्या जाणाऱ्या सूर्यफूल पिकांसाठी राज्य सरकार अंतरिम मदत म्हणून प्रति क्विंटल रुपये 1,000 देत आहे. पण, राज्य सरकारने 6,400 रुपये प्रति क्विंटल या एमएसपीवर सूर्यफुलाची खरेदी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज याच मागणीसाठी यापूर्वी 6 जून रोजी कुरुक्षेत्रच्या शहााबादमध्ये शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. गुरुनाम सिंग चधुनी यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली. सध्या दिल्ली-चंदीगड महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले आहेत. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. शांततेत आंदोलन सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली