शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Farmers Protest: शेतकऱ्यांचे आज सामूहिक उपोषण; देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 06:58 IST

तीनही कृषी कायदे सरकारने मागे घेण्याच्या मागणीवर ठाम

नवी दिल्ली : केंद्राने केलेेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम असून, सोमवार, १४ डिसेंबरपासून आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. शेतकरी संघटनांचे नेते सोमवारी सामूहिक उपोषण करणार असून, देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या सिंघू सीमेवर संयुक्त पत्रकार परिषदेत  नेते गुरनामसिंग चदुनी आंदोलनाची रुपरेषा मांडली. काही संघटना आंदोलन मागे घेत असून, कायद्यांना आमचा पाठिंबा असल्याचे सांगत आहेत. मात्र, आमचा त्या संघटनांशी काहीही संबंध नसून सरकार कायदे मागे घेत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील, याचा पुनरुच्चार चदुनी यांनी केला. सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून, सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवले जात आहे, असाही आरोप त्यांनी केला. शहाजहाँपूर महामार्ग बंद करण्याच्या आंदोलनात हनन मोल्ला, डॉ.अशोक ढवळे, राजू शेट्टी, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, योगेंद्र यादव, सत्यवान, कविता कुरुगंटी, वेंकटरामय्या हे अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, तसेच आमरा राम, पी.कृष्ण प्रसाद, विजू कृष्णन, मेजर सिंह, सुरेंद्र सिंह, फुलसिंह शेवकंद, विक्रम सिंह, उषा राणी, मयुख विश्वास आणि इतर नेते सहभागी झाले. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपमहानिरीक्षकांनी दिला राजीनामा आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जाखड यांनी  शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. महामार्ग रोखलाजयपूरहून दिल्लीकडे जाणारा अखेरचा राष्ट्रीय महामार्ग शहाजहाँपूर येथे रविवारी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या हजारो शेतकऱ्यांनी बंद करून टाकला. इतर चार महामार्ग यापूर्वीच बंद केले गेले आहेत.