शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Farmers Protest: दिल्लीत राजपथावर देशाचे शक्तिप्रदर्शन; शेवटचा ट्रॅक्टर संपेपर्यंत ही रॅली सुरू राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 07:25 IST

रॅलीमध्ये केवळ पाच हजार लोक असावेत असे पोलीस आणि शेतकऱ्यांच्या चर्चेअंती ठरले असले तरी लाखो शेतकरी यात सहभागी होत आहेत.

विकास झाडे

नवी दिल्ली : दिल्लीच्या तीन सीमेवरून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघत आहे. त्यात टीकरी, सिंघू आणि गाझीपूर या तीन सीमांचा समावेश आहे. शासकीय परेड आटोपल्यानंतर शेतकऱ्यांची रॅली सुरू करावी, अशा प्रशासनाच्या सूचना असल्या तरी सकाळी ९ वाजता शेतकरी रॅलीला सुरुवात करणार आहेत. जवळपास ३७० कि.मी.च्या परिघात ही रॅली असेल. यात कवायतीपासून देशप्रेमावर आधारित विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे शेवटचा ट्रॅक्टर संपेपर्यंत ही रॅली सुरू राहील. त्यासाठी तीन दिवस लागू शकतात.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज दोन महिने झालेत. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपी कायदा लागू करावा म्हणून दिल्लीतील सहा सीमा अडवल्या आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अकरा बैठका होऊनही कोणताही तोडगा निघू शकला नाही. एक महिन्याभरापूर्वीच शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. प्रशासनाने मान्यता दिल्याप्रमाणे उद्या तीन सीमांवरून प्रचंड रॅली निघत आहे.

टीकरी सीमेहून ११० कि.मी. तर सिंघू सीमेहून ९० कि.मी. रॅली काढली जाणार आहे. गाझीपूर सीमेवरून निघणाऱ्या रॅलीचा परिघ हा जवळपास ७० कि.मी. असेल. पलवलचे शेतकरी टीकरी सीमेवर जातील तर शहाजापूरचे शेतकरी गाझीपूर सीमेवर पोहोचले आहेत. ज्या सीमेवरून ही रॅली सुरू होईल तिथेच परत येणे बंधनकारक आहे. या रॅलीवर दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा पोलिसांची नजर असणार आहे. रॅलीदरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी सावधानता बाळगली जाणार आहे. रॅली सुरू होण्याची वेळ दुपारी १२ची आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी सकाळी ९ वाजता रॅली सुरू करणार आहेत. ही रॅली संपायला तीन दिवस लागू शकतात, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. रॅलीमध्ये केवळ पाच हजार लोक असावेत असे पोलीस आणि शेतकऱ्यांच्या चर्चेअंती ठरले असले तरी लाखो शेतकरी यात सहभागी होत आहेत. त्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

यंदा राजपथवर नसेल विदेशी पाहुणा!

प्रजासत्ताकदिनी राजपथवर विदेशातील पाहुणे हजेरी लावतात. त्यांना देशाच्या प्रगतीचे दर्शन होते. परंतु उद्या कोणताही विदेशी पाहुणा नसणार आहे. कोरोनामुळे यंदा पाहुणे रद्द झालेत. याआधी १९५२, १९५३ आणि १९६६मध्ये विदेशी पाहुणे विविध कारणाने अनुपस्थित होते.

लवकरच आंदोलन संपेल!

उद्या शेतकऱ्यांच्या रॅलीवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु शेतकऱ्यांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच हे आंदोलन संपुष्टात येईल असे संकेत त्यांनी दिलेत.

संसदेला घेराव!

आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. त्यात १ फेब्रुवारी रोजी संसदेला शेतकरी घेराव घालणार आहेत. आहे त्या सीमेहून शेतकरी चालत संसदेकडे येतील.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपagricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदी