शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest : 6 फेब्रुवारीला देशभर चक्का जाम, किसान मोर्चाची घोषणा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 2, 2021 09:26 IST

शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शवत महात्मा गांधी यांच्या पुन्यतिथी दिनी 30 जानेवारीला दिवसभर उपवास केला होता. तसेच 26 जानेवारीला दिल्ली येथे ट्रॅक्टर परेडदेखील काढली होती. मात्र, यावेळी काही लोकांनी दिल्लीच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला होता. 

नवी दिल्ली - केंद्राने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यातच आता किसान मोर्चाकडून 6 फेब्रुवारीला देशभरात चक्का जाम करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी 6 फेब्रुवारीला देशभरात दुपारी 12 ते 3 या वेळेत चक्का जाम करण्यात येणार आहे. 'भारतीय किसान युनियन'चे नेते बलबीर सिंग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. यामुळे आता गाझीपुर बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आलेली आहे.

नोव्हेंबरपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन -दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याने, तसेच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा करण्यात आली नसल्याचे म्हणतही बलबीर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या नोव्हेंबर 2020पासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीला घेऊन हे आंदोलन सुरू आहे. 

तत्पूर्वी, शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शवत महात्मा गांधी यांच्या पुन्यतिथी दिनी 30 जानेवारीला दिवसभर उपवास केला होता. तसेच 26 जानेवारीला दिल्ली येथे ट्रॅक्टर परेडदेखील काढली होती. मात्र, यावेळी काही लोकांनी दिल्लीच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला होता. 

11 वेळा चर्चा पण तोडगा नाही -सरकारने या तिन्ही कायद्यांच्या बाबतीत चर्चा करण्याची तयारी दाखवली. मात्र, कायदे रद्द करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. आतापर्यंत 11 बैठकांची सत्रे झाली असून अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवे कृषी कायदे एक ते दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, शेतकरी MSP ची हमी आणि कायदे परत घेण्यावर ठाम आहे.

केवळ एका फोन कॉलचे अंतर -दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव अद्यापही कायम असून, त्यांच्या आणि शेतकऱ्यांमध्ये केवळ एका फोन कॉलचेच अंतर असल्याचे मोदींनी म्हटले आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्लीChakka jamचक्काजाम