शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कष्टाचं फळ मिळालं, नशीब पालटलं; रोज 150 रुपये मजुरीसाठी भटकायचा, आता लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:49 IST

काही वर्षांपूर्वीपर्यंत परिसरातील लोक भयभीत होऊन जगत होते. रोजगाराचे साधन नव्हते. गावातील इतर लोकांसोबत तोही रोज कामावर जात असे

झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात राहणाऱ्या 39 वर्षीय ननकू उरांवने आपल्या कष्टाच्या जोरावर नशीब पालटलं आहे. ननकू याने दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वीपर्यंत परिसरातील लोक भयभीत होऊन जगत होते. रोजगाराचे साधन नव्हते. गावातील इतर लोकांसोबत तोही रोज कामावर जात असे. 150-200 रुपये मजुरी मिळायची. कुटुंब चालवणे अवघड होते. आता तो शेती करून दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतो.

ननकूप्रमाणेच रामगड जिल्ह्यातील पतरातू येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय उर्मिला देवी यांनी आपल्या मेहनतीने आपल्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदललं. उर्मिलाने तिच्या तीन एकर जमिनीत शेती सुरू केली आहे. आता मजुरीसाठी दूरच्या शहरात जावं लागत नाही. वर्षाला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याने मोठी सोय झाली आहे.

कोडरमा जिल्ह्यातील मरकच्चो येथून रांची येथील आंबा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले सुरेंद्र मेहता सांगतात की, काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष होता. मात्र आता सुमारे पाच एकरमधील आंब्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेळीपालन हे देखील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. आता त्याच्याकडे सुमारे 250 शेळ्या आहेत.

नाबार्डच्या मदतीने या शेतकऱ्यांना प्रगत रोपे, तांत्रिक सहाय्य व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थांचाही मोठा वाटा आहे. राज्यात 2008 मध्ये नाबार्डने बारी प्रकल्प सुरू केला. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. अत्यल्प जमीन असलेल्या अशा शेतकऱ्यांनाही नाबार्डकडून मदत दिली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

टॅग्स :Jharkhandझारखंड