शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

कष्टाचं फळ मिळालं, नशीब पालटलं; रोज 150 रुपये मजुरीसाठी भटकायचा, आता लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:49 IST

काही वर्षांपूर्वीपर्यंत परिसरातील लोक भयभीत होऊन जगत होते. रोजगाराचे साधन नव्हते. गावातील इतर लोकांसोबत तोही रोज कामावर जात असे

झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात राहणाऱ्या 39 वर्षीय ननकू उरांवने आपल्या कष्टाच्या जोरावर नशीब पालटलं आहे. ननकू याने दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वीपर्यंत परिसरातील लोक भयभीत होऊन जगत होते. रोजगाराचे साधन नव्हते. गावातील इतर लोकांसोबत तोही रोज कामावर जात असे. 150-200 रुपये मजुरी मिळायची. कुटुंब चालवणे अवघड होते. आता तो शेती करून दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतो.

ननकूप्रमाणेच रामगड जिल्ह्यातील पतरातू येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय उर्मिला देवी यांनी आपल्या मेहनतीने आपल्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदललं. उर्मिलाने तिच्या तीन एकर जमिनीत शेती सुरू केली आहे. आता मजुरीसाठी दूरच्या शहरात जावं लागत नाही. वर्षाला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याने मोठी सोय झाली आहे.

कोडरमा जिल्ह्यातील मरकच्चो येथून रांची येथील आंबा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले सुरेंद्र मेहता सांगतात की, काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष होता. मात्र आता सुमारे पाच एकरमधील आंब्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेळीपालन हे देखील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. आता त्याच्याकडे सुमारे 250 शेळ्या आहेत.

नाबार्डच्या मदतीने या शेतकऱ्यांना प्रगत रोपे, तांत्रिक सहाय्य व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थांचाही मोठा वाटा आहे. राज्यात 2008 मध्ये नाबार्डने बारी प्रकल्प सुरू केला. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. अत्यल्प जमीन असलेल्या अशा शेतकऱ्यांनाही नाबार्डकडून मदत दिली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

टॅग्स :Jharkhandझारखंड