शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कष्टाचं फळ मिळालं, नशीब पालटलं; रोज 150 रुपये मजुरीसाठी भटकायचा, आता लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:49 IST

काही वर्षांपूर्वीपर्यंत परिसरातील लोक भयभीत होऊन जगत होते. रोजगाराचे साधन नव्हते. गावातील इतर लोकांसोबत तोही रोज कामावर जात असे

झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात राहणाऱ्या 39 वर्षीय ननकू उरांवने आपल्या कष्टाच्या जोरावर नशीब पालटलं आहे. ननकू याने दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वीपर्यंत परिसरातील लोक भयभीत होऊन जगत होते. रोजगाराचे साधन नव्हते. गावातील इतर लोकांसोबत तोही रोज कामावर जात असे. 150-200 रुपये मजुरी मिळायची. कुटुंब चालवणे अवघड होते. आता तो शेती करून दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतो.

ननकूप्रमाणेच रामगड जिल्ह्यातील पतरातू येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय उर्मिला देवी यांनी आपल्या मेहनतीने आपल्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदललं. उर्मिलाने तिच्या तीन एकर जमिनीत शेती सुरू केली आहे. आता मजुरीसाठी दूरच्या शहरात जावं लागत नाही. वर्षाला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याने मोठी सोय झाली आहे.

कोडरमा जिल्ह्यातील मरकच्चो येथून रांची येथील आंबा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले सुरेंद्र मेहता सांगतात की, काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष होता. मात्र आता सुमारे पाच एकरमधील आंब्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेळीपालन हे देखील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. आता त्याच्याकडे सुमारे 250 शेळ्या आहेत.

नाबार्डच्या मदतीने या शेतकऱ्यांना प्रगत रोपे, तांत्रिक सहाय्य व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थांचाही मोठा वाटा आहे. राज्यात 2008 मध्ये नाबार्डने बारी प्रकल्प सुरू केला. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. अत्यल्प जमीन असलेल्या अशा शेतकऱ्यांनाही नाबार्डकडून मदत दिली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

टॅग्स :Jharkhandझारखंड