शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांची मोर्चा उद्या दिल्लीच्या दिशेनं रवाना होणार; सुरक्षा वाढवली, इंटरनेट सेवा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 12:11 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्ग ४४ बंद आहे.

नवी दिल्ली:  पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, सोमवारी शंभू सीमेवर शेतकरी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला. शेतकऱ्यांनी २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता दिल्लीकडे कूच करण्याची तयारी केली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्ग ४४ बंद आहे. मार्कंडा नदी पुलाजवळ सीलबंद महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था शिथिल करण्याऐवजी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक भागात इंटरनेट सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. सरकारसोबत शेतकऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक परिणाम न झाल्याने सुरक्षा दल अधिक सतर्क झाले आहे. दातासिंगवाला हद्दीतील शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हरियाणातूनही अनेक शेतकरी पंजाबच्या सीमेवर पोहोचले आहेत. हळूहळू शेतकऱ्यांचा ताफा वाढत आहे. यावेळी महिलांची संख्याही वाढत आहे. स्त्रिया आपल्या मुलांची जबाबदारी घेत आहेत.

२१ फेब्रुवारीला दिल्लीकडे रवाना होणार-

२१ फेब्रुवारीला आम्ही दिल्लीकडे कूच करणार आहोत, असे शेतकरी नेते पढेर सांगतात. सरकारसोबत सध्या कोणतीही बैठक होणार नाही. मात्र आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. डल्लेवाल म्हणाले की, आम्ही सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या मान्य करा किंवा आम्हाला दिल्लीत शांततेने बसू द्या. आम्ही सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की, हिंसाचार करू नका.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाबHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकार