शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 15:30 IST

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि कृषी विकास हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला.

हैदराबाद : शेतकरी कर्जमाफी कार्यक्रम ३ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि कृषी विकास हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला.

अनेक आव्हानांचा सामना करूनही सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे आलेली आर्थिक मंदी, कोरोना महामारीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, एफआरबीएम निधी न जारी करून तेलंगणा राज्याप्रति केंद्राने दाखविलेली सूडबुद्धीची वृत्ती, यामुळे राज्याची वित्तीय तूट वाढली. परिणामी, शेतकरी कर्जमाफी योजनेला विलंब झाला.  

राज्याची आर्थिक परिस्थिती सदृढ असताना मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकरी कर्जमाफी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर प्रगती भवन येथे उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत राज्याचे अर्थमंत्री टी. हरीश राव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार सोमेश कुमार, अर्थ विभागाचे विशेष मुख्य सचिव रामकृष्ण राव, एचएमडीएचे प्रधान सचिव अरविंद कुमार आणि कृषी सचिव रघुनंदन राव यांची उपस्थिती होती.

आणखी १९,००० कोटी रुपयांची आवश्यकता मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, त्यांनी दिलेल्या वचनानुसार सरकार शेतकरी कर्जमाफी योजना राबवत आहे. आधीच माफ केलेल्या कर्जानंतर, प्रलंबित शेती कर्ज माफ करण्यासाठी आणखी १९,००० कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री केसीआर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणाFarmerशेतकरी