शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शंभू सीमेवर शेतकऱ्यांना अडवले; अश्रुधुराचा मारा, अनेक जखमी, दिल्लीकडे निघालेल्या आक्रमक शेतकऱ्यांना रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 05:30 IST

आंदोलन एक दिवस स्थगित

शंभू/नवी दिल्ली : आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने पायी निघालेल्या १०१ शेतकऱ्यांना हरयाणाच्या शंभू सीमेवर पोलिसांनी अडथळे लावून रोखले. काही शेतकरी यावेळी आक्रमक झाले. त्यांनी अडथळे ओलांडण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या संपूर्ण भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी काही शेतकरी जखमी झाल्याने संघटनांनी हे आंदोलन एक दिवस स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

शेतमालाच्या किमान हमीभावास कायदेशीर हमी मिळावी, ही या शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे शेतकरी पायी दिल्लीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, शंभू सीमेवरील पुलावर पोलिसांनी लावलेल्या लोखंडी जाळ्या काही शेतकऱ्यांनी काढून नदीत टाकल्या. शेतकरी आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही शेतकरी जखमी झाले आहेत. काही शेतकऱ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

१०१ शेतकरी निघाले दिल्लीकडे पायी

११ गावांत इंटरनेट, एसएमएस बंद हरयाणा सरकारने अंबाला जिल्ह्यातील ११ गावांत इंटरनेट सेवा, तसेच बल्क एसएमएस सुविधा तात्पुरती बंद केली आहे.

■ यावेळी आक्रमक झालेल्या मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यावेळी काही शेतकरी जखमी झाले आहेत. एक शेतकरी या मार्गावर असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर चढला. त्यावेळी येथे तैनात पोलिसांनी त्यास हसकावून लावले.

■ किमान हमी भावास कायदेशीर हमी देण्यासह इतर मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने पायी निघालेल्या शेतकऱ्यांनी आपला मोर्चा एक दिवसासाठी स्थगित केला. १०१ शेतकऱ्यांनी हा मोर्चा सुरू केल्यानंतर हरयाणा पोलिसांनी त्यांना सीमेवर अडवले.

अडवण्याचा प्रकार निषेधार्ह : राहुल गांधी 

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रकार निषेधार्ह • असल्याचे नमूद करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला आवाहन केले. या शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीयनि दखल घेत त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी, असे राहुल यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये नमूद केले.

शेतकरी आपल्या वेदना मांडण्यासाठी दिल्लीत येऊ इच्छित आहेत. 3 त्यांच्यावर अश्रुधुराचा व बळाचा वापर करणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे पूर्वी शेतकरी आंदोलनांत शहीद झालेल्या ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा देशाला अजून विसर पडलेला नाही, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

दिल्ली सीमेवरही बंदोबस्त वाढवला 

हरयाणातून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता दिल्ली सीमेवर सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला असून, संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरी