शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

शंभू सीमेवर शेतकऱ्यांना अडवले; अश्रुधुराचा मारा, अनेक जखमी, दिल्लीकडे निघालेल्या आक्रमक शेतकऱ्यांना रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 05:30 IST

आंदोलन एक दिवस स्थगित

शंभू/नवी दिल्ली : आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने पायी निघालेल्या १०१ शेतकऱ्यांना हरयाणाच्या शंभू सीमेवर पोलिसांनी अडथळे लावून रोखले. काही शेतकरी यावेळी आक्रमक झाले. त्यांनी अडथळे ओलांडण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या संपूर्ण भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी काही शेतकरी जखमी झाल्याने संघटनांनी हे आंदोलन एक दिवस स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

शेतमालाच्या किमान हमीभावास कायदेशीर हमी मिळावी, ही या शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे शेतकरी पायी दिल्लीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, शंभू सीमेवरील पुलावर पोलिसांनी लावलेल्या लोखंडी जाळ्या काही शेतकऱ्यांनी काढून नदीत टाकल्या. शेतकरी आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही शेतकरी जखमी झाले आहेत. काही शेतकऱ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

१०१ शेतकरी निघाले दिल्लीकडे पायी

११ गावांत इंटरनेट, एसएमएस बंद हरयाणा सरकारने अंबाला जिल्ह्यातील ११ गावांत इंटरनेट सेवा, तसेच बल्क एसएमएस सुविधा तात्पुरती बंद केली आहे.

■ यावेळी आक्रमक झालेल्या मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यावेळी काही शेतकरी जखमी झाले आहेत. एक शेतकरी या मार्गावर असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर चढला. त्यावेळी येथे तैनात पोलिसांनी त्यास हसकावून लावले.

■ किमान हमी भावास कायदेशीर हमी देण्यासह इतर मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने पायी निघालेल्या शेतकऱ्यांनी आपला मोर्चा एक दिवसासाठी स्थगित केला. १०१ शेतकऱ्यांनी हा मोर्चा सुरू केल्यानंतर हरयाणा पोलिसांनी त्यांना सीमेवर अडवले.

अडवण्याचा प्रकार निषेधार्ह : राहुल गांधी 

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रकार निषेधार्ह • असल्याचे नमूद करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला आवाहन केले. या शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीयनि दखल घेत त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी, असे राहुल यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये नमूद केले.

शेतकरी आपल्या वेदना मांडण्यासाठी दिल्लीत येऊ इच्छित आहेत. 3 त्यांच्यावर अश्रुधुराचा व बळाचा वापर करणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे पूर्वी शेतकरी आंदोलनांत शहीद झालेल्या ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा देशाला अजून विसर पडलेला नाही, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

दिल्ली सीमेवरही बंदोबस्त वाढवला 

हरयाणातून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता दिल्ली सीमेवर सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला असून, संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरी