शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
4
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
5
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
6
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
7
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
8
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
9
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
10
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
11
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
12
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
13
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
14
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
15
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
16
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
17
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
18
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
19
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
20
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

'शेतकऱ्यांनी राजाला झुकायला भाग पाडले'; कृषी कायद्यांच्या निर्णयावर प्रकाश राज यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:44 IST

प्रकाश राज यांनी ट्विटरवर त्यांनी वाचलेल्या एका कवितेचा व्हिडिओही पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली: अभिनेते प्रकाश राज हे सोशल मीडियावर आपले मत मुक्तपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकवेळा विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले आहे. प्रकार राज भाजपचे टीकाकार आहेत, त्यामुळे त्यांनी अनेकदा भाजपविरोधात वक्तव्यं केलेली पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा त्यांनी सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदा मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानंतर मागील एका वर्षापेक्षा जास्त काळापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या निर्णयावर विविध क्षेत्रातील लोक आपले मत मांडत आहेत. याच निर्णयावर प्रकाश राज यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवरुन त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये प्रकाश राज यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाचे कौतुक केले आहे. 'माझ्या देशातील संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी राजाला झुकायला भाग पाडले. मी अनिता नायर यांची एक कविता वाचली होती, जी कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने होती..' अशाप्रकारचे ट्वीट प्रकाश राज यांनी केले आहे. यासोबतच शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वतः वाचलेल्या कवितेचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

नरेंद्र मोदी काय म्हणाले ?आज सकाळी नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, ''शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे'', असं मोदींनी जाहीर केलं.

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजNarendra Modiनरेंद्र मोदी