शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'शेतकऱ्यांनी राजाला झुकायला भाग पाडले'; कृषी कायद्यांच्या निर्णयावर प्रकाश राज यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:44 IST

प्रकाश राज यांनी ट्विटरवर त्यांनी वाचलेल्या एका कवितेचा व्हिडिओही पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली: अभिनेते प्रकाश राज हे सोशल मीडियावर आपले मत मुक्तपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकवेळा विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले आहे. प्रकार राज भाजपचे टीकाकार आहेत, त्यामुळे त्यांनी अनेकदा भाजपविरोधात वक्तव्यं केलेली पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा त्यांनी सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदा मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानंतर मागील एका वर्षापेक्षा जास्त काळापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या निर्णयावर विविध क्षेत्रातील लोक आपले मत मांडत आहेत. याच निर्णयावर प्रकाश राज यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवरुन त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये प्रकाश राज यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाचे कौतुक केले आहे. 'माझ्या देशातील संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी राजाला झुकायला भाग पाडले. मी अनिता नायर यांची एक कविता वाचली होती, जी कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने होती..' अशाप्रकारचे ट्वीट प्रकाश राज यांनी केले आहे. यासोबतच शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वतः वाचलेल्या कवितेचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

नरेंद्र मोदी काय म्हणाले ?आज सकाळी नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, ''शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे'', असं मोदींनी जाहीर केलं.

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजNarendra Modiनरेंद्र मोदी