शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

पंतप्रधान मोदींवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही; राहुल गांधींनी ट्विटरवरून साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 07:02 IST

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘असत्याग्रही’च्या दीर्घ इतिहासामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही, असा आरोप करुन काँग्रेसचे नेते ...

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘असत्याग्रही’च्या दीर्घ इतिहासामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही, असा आरोप करुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ते  कृषी कायदे ते रद्द का करीत नाहीत? असा सवालही  केला.   काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ऑनलाईन सर्वेक्षणासाठी लोकांना हा प्रश्न विचारत  ट्विटवर सोबत चार पर्याय देत  मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी पूर्वी दिलेली काही आश्वासने आणि केलेल्या विधानांचाही या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. ‘प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार’ , ‘ मला ५० दिवसांची मुदत द्या, नाही तर...’ २१ दिवसांत कोरोनाविरुद्ध युद्ध आपण जिंकू’ ‘ कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही , ना कोणी कोणत्याच चौकीवर कब्जा केलेला नाही, या पंतप्रधानांच्या विधानांचा उल्लेख केला.  पंतप्रधान कृषी कायदे रद्द  का करीत नाहीत? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी असे  चार पर्यांय लोकांसाठी सूचित  केले आहे.  कारण ते शेतकरीविरोधी आहेत. ते भांडवलदारांचे ऐकतात,  ते अहंकारी आहेत किंवा हे सर्व पर्याय बरोबर आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरी