शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकऱ्यांचा आज ‘भारत बंद’! दूध, फळे, भाजीपाल्याचा पुरवठा होणार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:29 IST

Farmers Protest : जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी मंगळवारी भारत बंद पुकारला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या संघटनांनी आपल्या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय नेत्यांना येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे.

- विकास झाडे नवी दिल्ली : जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी मंगळवारी भारत बंद पुकारला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या संघटनांनी आपल्या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय नेत्यांना येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल आणि राकेश टिकेत यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत भारत बंद करण्यात येणार आहे. परंतु आपत्कालीन सेवांना परवानगी देण्यात येईल. केंद्र सरकार कायदे मागे घेईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, याचा पुनरुच्चार संघटनेच्या नेत्यांनी केला. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंघू सीमेवरील गुरू तेग बहादुर मेमोरियल येथे जाऊन आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तेथील व्यवस्थेचीही पाहणी केली. इथे मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक सेवक म्हणून येथे आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, राजेंद्र पाल गौतम, इमरान हुसेन हे मंत्रीसुद्धा उपस्थित होते.शेतकरी आंदोलनाला तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा असला तरी बंदमध्ये सहभागी होणार नाही. केरळमधील सत्ताधारी डावी आघाडी व काँग्रेसचा बंदला पाठिंबा आहे परंतु तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्या असल्याने राज्यात बंद पाळला जाणार नाही. मात्र तिन्ही कृषी कायद्यांविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. 

पुरस्कार वापसी! आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पंजाबमधील खेळाडू पुढे आले आहेत. जवळपास ३० खेळाडूंनी पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपती भवनाची वाट धरली. परंतु, दिल्ली पोलिसांकडून त्यांना रस्त्यातच अडवण्यात आले. पंजाब आणि इतर ठिकाणच्या काही खेळाडूंनी आपले पुरस्कार सरकारला परत देणार असल्याचे कुस्तीपटू करतार सिंह यांनी सांगितले.

किमान हमीभाव द्या! शेतकऱ्यांचे उत्पन्न  वाढवण्यासाठी किमान हमीभावासंबंधीचा कायदा आवश्यक असल्याचे मत दिल्लीचे कृषिमंत्री गोपाल राय यांनी सोमवारी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या विकासासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक बोलाविली. यात दिल्ली, पंजाब तसेच हरयाणाचे कृषिमंत्री या बैठकीत उपस्थित होते.  

फळे-भाज्या महागल्या! दिल्ली तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ८० टक्के शेतमाल दिल्लीतील आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून येतो. आंदोलनामुळे फळ, भाज्यांची दरदिवशीची आवक सरासरी ५ हजार ५०० मेट्रिक टनांनी घटली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी