शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 18:18 IST

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एनडीए सरकार सत्तेत आलं असून पहिल्या दिवसापासून मोदींनी शेतकऱ्यांसाठी काम करणं सुरू केले आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ जूनला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १७ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. वाराणसीतून मोदींनी देशातील ९.२ कोटी शेतकऱ्यांना २-२ हजारांचा निधी ट्रान्सफर केला. आता आणखी एक गिफ्ट शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकार वेळोवेळी विविध निर्णय घेत असते. त्यात सरकारने डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी उडीद आणि तूर डाळीच्या MSP वर १० टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोयाबीन आणि सनफ्लॉवर तेलाच्या MSP दरातही ५ ते ७ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळेल असं सांगण्यात येत आहे. त्यासोबत सरकार यंदा बोनसही जाहीर करू शकते. CACP ने सरकारला दिलेल्या शिफारशीत हे म्हटलं आहे. CNBC नं याबाबत वृत्त दिलं आहे. 

तूर आणि उडीद डाळीचं उत्पादन कमी होणं चिंताजनक आहे. धानाच्या किंमतीत ४-५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सरकार धानासह १४ पिकांचे एमएसपी ठरवते. कृषी खर्च आणि किंमत आयोग (CACP) च्या शिफारशीनुसार सरकार दरवर्षी २३ पिकांच्या दरांचे MSP दर ठरवते. सीएसीपी हा कृषी मंत्रालयात अंतर्गत येणारा आयोग आहे. त्यात सात तृणधान्ये (मका, ज्वारी, बाजरी, धान, गहू, बार्ली आणि नाचणी), पाच कडधान्ये (मूग, तूर, हरभरा, उडीद आणि मसूर), सात तेल (सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, करडई, भुईमूग, रेपसीड-मोहरी आणि नायजर बियाणे) आणि चार व्यावसायिक पिके (कापूस, खोबरं, ऊस आणि कच्चा ताग) यांचा समावेश होतो. 

दरम्यान, कृषी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. केंद्रात तिसऱ्यांदा भाजपा सत्तेत येताच नरेंद्र मोदी आणि सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी भाजपा सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी विभाग कमी पडणार नाही. आमच्या टीमनं १०० दिवसांचा रोडमॅप बनवला आहे. त्याला लवकरच अंतिम स्वरुप दिलं जाईल अशी माहिती कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी