शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:09 IST

Bihar Crime News: गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये सातत्याने गुन्हे घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहेत. अशावेळी जनतेच्या सुरक्षेबाबत विचारलं असता बिहार पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये सातत्याने गुन्हे घडत आहेत. राज्यात गुन्हेगार मोकाट असून, गोळीबार, खून यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहेत. अशावेळी जनतेच्या सुरक्षेबाबत विचारलं असता बिहार पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

बिहार पोलीस दलातील एडीजी एसटीएफ कुंदन कृष्णन यांनी सांगितले की, बिहारमध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात शेतकऱ्यांना फारशी कामं नसतात. त्यामुळे या महिन्यांमध्ये खुनासारखे गुन्हे अधिक घडतात. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाकडे फारसं गाम नसतं, याचदरम्यान, गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं.

त्यांनी पुढे सांगितले की, पाऊस पडताच शेतकरी शेतीच्या कामांमध्ये गुंततात. त्यामुळे खुनासारख्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी होतं. बेरोजगारी आणि मोकळा वेळ यामुळे तरुण पैशांच्या मोहापायी सुपारी घेऊन हत्या करण्यासारख्या गुन्ह्यांकडे आकर्षित होत आहेत. एडीजी कुंदन कृष्णन यांनी सांगितले की, खुनासारखे गुन्हे संपूर्ण राज्यामध्ये घडत असतात. मात्र सध्या निवडणुकीचं वातावरण असल्याने राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे त्याकडे अधिक लक्ष देत आहेत, असेही ते म्हणाले.

मात्र आता कुंदन कृष्णन यांनी केलेल्या या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलिसांजी जबाबदारी नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकरी आणि तरुणांना गुन्हेगारीसाठी दोषी ठरवून पोलीस आपली जबाबदारी टाखू शकताता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस