शहरं
Join us  
Trending Stories
1
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
2
आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी...
3
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
4
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
5
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
6
Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले
7
Goa Night Club Fire: म्युझिक, डान्स फ्लोअरवर १०० जण आणि...आग लागली तेव्हा काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने दिली धक्कादायक माहिती
8
संधी गमावू नका! PNB च्या या खास एफडीमध्ये फक्त १ लाख जमा करा, मिळेल २३,८७२ रुपयांपर्यंत निश्चित व्याज
9
अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
10
कमाल! AI ने वाचवला व्यक्तीचा जीव; डॉक्टरांनी घरी पाठवलं, पण Grok ने ओळखला जीवघेणा आजार
11
अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
12
सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
13
स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय
14
Goa Nightclub Fire:शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
15
इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
16
भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
17
धारावी-घाटकोपर जलबोगद्याला मंजुरी; सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेण्यास गती
18
धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग
19
भारतातूनच परतताच पुतिन यांच्यासाठी खूशखबर, रशियाला मिळाली मोठी ऑफर; अमेरिकेची झोप उडाली
20
काय सांगता! 'या' देशात पुरुषांची लोकसंख्या घटली; पती भाड्याने घेण्याची महिलांवर आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:09 IST

Bihar Crime News: गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये सातत्याने गुन्हे घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहेत. अशावेळी जनतेच्या सुरक्षेबाबत विचारलं असता बिहार पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये सातत्याने गुन्हे घडत आहेत. राज्यात गुन्हेगार मोकाट असून, गोळीबार, खून यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहेत. अशावेळी जनतेच्या सुरक्षेबाबत विचारलं असता बिहार पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

बिहार पोलीस दलातील एडीजी एसटीएफ कुंदन कृष्णन यांनी सांगितले की, बिहारमध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात शेतकऱ्यांना फारशी कामं नसतात. त्यामुळे या महिन्यांमध्ये खुनासारखे गुन्हे अधिक घडतात. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाकडे फारसं गाम नसतं, याचदरम्यान, गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं.

त्यांनी पुढे सांगितले की, पाऊस पडताच शेतकरी शेतीच्या कामांमध्ये गुंततात. त्यामुळे खुनासारख्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी होतं. बेरोजगारी आणि मोकळा वेळ यामुळे तरुण पैशांच्या मोहापायी सुपारी घेऊन हत्या करण्यासारख्या गुन्ह्यांकडे आकर्षित होत आहेत. एडीजी कुंदन कृष्णन यांनी सांगितले की, खुनासारखे गुन्हे संपूर्ण राज्यामध्ये घडत असतात. मात्र सध्या निवडणुकीचं वातावरण असल्याने राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे त्याकडे अधिक लक्ष देत आहेत, असेही ते म्हणाले.

मात्र आता कुंदन कृष्णन यांनी केलेल्या या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलिसांजी जबाबदारी नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकरी आणि तरुणांना गुन्हेगारीसाठी दोषी ठरवून पोलीस आपली जबाबदारी टाखू शकताता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस