शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

Kisan Kranti Padyatra: 'राजा'विरोधात बळीराजाचा एल्गार, दिल्लीच्या वेशीवर पोलीस-शेतकरी भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 11:37 IST

कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे.

नवी दिल्ली - कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा आणि पाण्य़ाच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच दिल्लीच्या पूर्व भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

 

दरम्यान, जर दिल्लीतील सरकारला आमच्या समस्या ऐकवायच्या नाहीत, तर मग कुणाला ऐकवायच्या. आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जायचं का? असा सवाल शेतकरी नेत्यांनी केला आहे. 

भारतीय किसान युनियनच्या झेंड्याखाली किसान क्रांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा आज सकाळी राजधानी नवी दिल्लीच्या उंबरठ्यावर पोहोचली. मात्र या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला असून, राजधानीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे सीमेवरील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांच्या मागण्या - 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे- पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करण्यात यावा- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर देय रक्कम द्यावी- शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी- सिंचनासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा- किसान क्रेडिट कार्डवर व्याजमुक्त कर्ज मिळावे- भटक्या जनावरांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी व्यवस्था करावी- सर्व पिकांची पूर्णपणे खरेदी व्हावी- स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारण्यात यावा- उसाची देय रक्कम मिळण्यास उशीर झाल्यास त्यावर व्याज मिळावे 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकारNew Delhiनवी दिल्ली