शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

शेतकरी आंदोलनाला लवकरच पूर्णविराम मिळेल- नरेंद्र सिंह तोमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:13 IST

शेतकऱ्यांकडून येणाऱ्या प्रस्तावाची आम्ही वाट पाहत आहोत

- विकास झाडेनवी दिल्ली : आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आम्ही सन्मान करतो. परंतु तोडगा काढायचा असेल, तर तो सीमेवर निघणार नाही, टेबलवरच निघू शकतो. आम्ही शेतकऱ्यांकडून येणाऱ्या प्रस्तावाची वाट पाहत आहोत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.भाजपचे थिंक टॅंक खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी मोजक्या पत्रकारांसमोर नरेंद्र सिंग तोमर यांनी कृषी कायदे आणि आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. तोमर म्हणाले, मोदी सरकारची भूमिका सतत शेतकऱ्यांच्या कल्याणाची आणि न्याय देण्याची आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत आम्ही ११ बैठका घेतल्या. तासन‌्तास चाललेल्या या बैठकांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचीच चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, शेवटच्या बैठकीमध्ये आम्ही तिन्ही कृषी कायदे दीड वर्षे स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. आता आम्ही शेतकऱ्यांकडून नव्या प्रस्तावाची वाट पाहात आहोत. मनात कोणताही संभ्रम न ठेवता त्यांच्याकडून मनमोकळी चर्चा अपेक्षित आहे. कायद्याचे अध्ययन व्हावेशेतकऱ्यांनी कायद्यातील कोणतेही आक्षेप ठोसपणे मांडले नाहीत. त्यांनी आधी कायद्याचे अध्ययन करावे त्यानंतर त्यांनाच हा कायदा शेतकऱ्यांच्या किती हिताचा आहे, ते पटेल. कायदा पारित झाला, तेव्हा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कायद्याचे स्वागत केले होते, याकडेही तोमर यांनी लक्ष वेधले.‘एमएसपी‘ कायदा कसा शक्य आहे?तोमर म्हणाले, एमएसपीचा कायदा कसा शक्य आहे? याचा भुर्दंड सामान्यांवर बसेल. परंतु एमएसपी आधीप्रमाणेच सुरू आहे. त्याला जराही छेडले जाणार नाही. शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविण्यात आला आहे. काँग्रेसकडून दिशाभूलकेवळ राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. परंतु ही बाब फार काळ टिकणार नाही. शेतकऱ्यांनाही सत्य काय आहे ते उलगडेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर