शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: शेतकऱ्याची आत्महत्या, दुसऱ्याचा थंडीने मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 03:37 IST

शेतकऱ्यांना करावा लागत आहे कडाक्याचा थंडीचा सामना; मागे न हटण्याचा बैठकीत निर्णय

- विकास झाडेनवी दिल्ली : दिल्लीतील कडाक्याच्या थंडीचा आंदोलक शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. थंडीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एकाने ट्रक्टरखाली येऊन आत्महत्या केली. दररोज होणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असून आता जराही मागे हटायचे नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी आज बैठकीत घेतला.आंदोलनाचा २२ वा दिवस आहे. हवेत प्रचंड गारठा आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडे सोयी नाहीत. टिकरी सीमेवर थंडीने गारठल्याने हरियाणाच्या जय सिंह या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे बुधवारी बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येचे दु:ख अनावर झाल्याने जसवीर सिंह या शेतकऱ्यांने स्वत:ला ट्रक्टरखाली झोकून आत्महत्या केली. बाबा राम सिंह यांनी बुधवारी सिंघू सीमेवर स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली होतीे. शेतकरी इतक्या वेदनेत असतांना केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात नोंदविले होते. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून सिंघू सीमेवर गॅस हीटर लावण्यात आले आहेत. परंतु ते अपूर्ण आहेत व गॅसचा खर्चही शेतकऱ्यांना परवडणारा नाही. ज्येष्ठ वकील मांडतील बाजूगरुवारी सिंघू सीमेवर संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असणाºया शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा झाली. संघटनेचे सदस्य संदीप पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान आंदोलक संघटनांची बाजू ऐकून घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने आठ संघटना पक्षकार केल्याची माहिती मिळत आहे. मात्र यापैकी भारतीय किसान युनियन (भानु) ही संघटना संयुक्त किसान मोर्चाचा घटक नाही व उर्वरित सात संघटनांना न्यायालयाकडून कोणतीही सूचना अद्याप प्राप्त झाली नाही. संयुक्त किसान मोर्चाच्या समितीने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संदर्भात प्रशांत भूषण, भूषण दवे, कोलीन गोनसाल्वीस, एच.एस. फुलका यांच्यासोबत प्राथमिक चर्चा केली आहे. दुभाजकावर बीजारोपण!युपीगेट महामार्गावरील दुभाजकावर शेतकऱ्यांनी आता पालेभाज्या लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आंदोलन अधिक दिवस चालले तर भाजीपाला कामात येईल असे शेतकऱ्यांनी सांगितले.‘दोन पावले मागे घ्यावीत’ भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकेत यांनी शेतकरी आणि सरकारने दोन पावले मागे घेतली तर तोडगा निघू शकतो आणि आंदोलन मागे घेतल्या जाईल. सर्वोच्च न्यायालय तिसरा पक्ष बनून आल्याने लवकरच मार्ग निघेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली.…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी झाडून घेतली गोळीचंदिगड - शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र झालेले आहे. या आंदोलनादरम्यान, संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. बाबा राम सिंह यांचे शिष्य असलेले गुलाब सिंह यांनी आत्महत्येमागचं कारण स्पष्ट केलं. गुलाब सिंह यांनी सांगितले की, ९ डिसेंबर रोजी बाबाजींनी शेतकरी आंदोलनाला पाच लाख रुपयांची देणगी दिली होती. बुधवारी बाबा राम सिंह पुन्हा एकदा आंदोलनस्थळी पोहोचले होते. तिथे त्यांनी आपल्या सेवादारांना स्टेजवर जाण्यास सांगितले. बाबा राम सिंह गाडीत बसलेले होते. त्यानंतर त्यांनी एका पत्रात लिहिले की, अशा परिस्थितीत मी माझे शरीर या आंदोलनाला समर्पित करत आहे. कारमधील पिस्तुलाने त्यांनी गोळी झाडली. 

टॅग्स :Farmerशेतकरी