शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

शेतकरी आंदोलनावरून नितीश कुमारांचे मोठे विधान, मोदी सरकारला केले असे आवाहन

By बाळकृष्ण परब | Updated: November 30, 2020 20:38 IST

Farmer Protest News : शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांसोबत भाजपाचे मित्रपक्षही सरकारला धारेवर धरू लागले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव सांगावा, त्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान होईलकेंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव सांगावा, त्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान होईल धान्याची खरेदी होईल आणि केंद्राकडून जे मूल्य निर्धारीत केले असेल ते त्यांना मिळेल

पाटणा - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांसोबत भाजपाचे मित्रपक्षही सरकारला धारेवर धरू लागले आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव सांगावा, त्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान होईल, असे विधान नितीश कुमार यांनी केले आहे.नितीश कुमार म्हणाले की, केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली तर धान्याच्या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नसल्याची खात्री शेतकऱ्यांना मिळेल. तसेच धान्याची खरेदी होईल आणि केंद्राकडून जे मूल्य निर्धारीत केले असेल ते त्यांना मिळेल, असेही नितीश कुमार म्हणाले.पाटणा येथील खगौल येथे दीघा-एम्स एलिव्हेटेट मार्गाचे लोकार्पण करताना पत्रकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत विचारले असता नितीश कुमार म्हणाले की, सध्या जी बोलणी चालू आहे. तसेच जे सांगितले जात आहे त्यानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकार धान्याच्या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचे सांगणार आहे. बिहारमध्ये आम्ही २००६ मध्येच जुनी व्यवस्था संपुष्टात आणली आहे. २००६ नंतर आम्ही धान्याची खरेदी पॅक्सच्या माध्यमातून करत आहोत. आधी इथे धान्याची खरेदी होत नसे. मात्र आम्ही ती करत आहोत.वाजपेयी सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून काम केलेले नितीश कुमार म्हणाले की, देशभरात याबाबत जे काही केले जात आहे ते लोकांमध्ये जाऊन सांगण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा व्हावी, असे केंद्र सरकारचे मत आहे. चर्चा झाली तर शेतकऱ्यांना कुठल्याही पिकाच्या खरेदीमध्ये अडथळा येणार नसल्याची खात्री मिळेल. खरेदी होईल आणि जे मूल्य केंद्र सरकारकडून निर्धारित केले जाईल, ते त्यांना मिळेल.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी