शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शेतकरी आंदोलनावरून नितीश कुमारांचे मोठे विधान, मोदी सरकारला केले असे आवाहन

By बाळकृष्ण परब | Updated: November 30, 2020 20:38 IST

Farmer Protest News : शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांसोबत भाजपाचे मित्रपक्षही सरकारला धारेवर धरू लागले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव सांगावा, त्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान होईलकेंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव सांगावा, त्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान होईल धान्याची खरेदी होईल आणि केंद्राकडून जे मूल्य निर्धारीत केले असेल ते त्यांना मिळेल

पाटणा - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांसोबत भाजपाचे मित्रपक्षही सरकारला धारेवर धरू लागले आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव सांगावा, त्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान होईल, असे विधान नितीश कुमार यांनी केले आहे.नितीश कुमार म्हणाले की, केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली तर धान्याच्या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नसल्याची खात्री शेतकऱ्यांना मिळेल. तसेच धान्याची खरेदी होईल आणि केंद्राकडून जे मूल्य निर्धारीत केले असेल ते त्यांना मिळेल, असेही नितीश कुमार म्हणाले.पाटणा येथील खगौल येथे दीघा-एम्स एलिव्हेटेट मार्गाचे लोकार्पण करताना पत्रकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत विचारले असता नितीश कुमार म्हणाले की, सध्या जी बोलणी चालू आहे. तसेच जे सांगितले जात आहे त्यानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकार धान्याच्या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचे सांगणार आहे. बिहारमध्ये आम्ही २००६ मध्येच जुनी व्यवस्था संपुष्टात आणली आहे. २००६ नंतर आम्ही धान्याची खरेदी पॅक्सच्या माध्यमातून करत आहोत. आधी इथे धान्याची खरेदी होत नसे. मात्र आम्ही ती करत आहोत.वाजपेयी सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून काम केलेले नितीश कुमार म्हणाले की, देशभरात याबाबत जे काही केले जात आहे ते लोकांमध्ये जाऊन सांगण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा व्हावी, असे केंद्र सरकारचे मत आहे. चर्चा झाली तर शेतकऱ्यांना कुठल्याही पिकाच्या खरेदीमध्ये अडथळा येणार नसल्याची खात्री मिळेल. खरेदी होईल आणि जे मूल्य केंद्र सरकारकडून निर्धारित केले जाईल, ते त्यांना मिळेल.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी