शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

“शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची ही पद्धत योग्य नाही”; CM मनोहरलाल खट्टर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:05 IST

Farmer Protest In Delhi: हजारो शेतकऱ्यांनी मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे.

Farmer Protest In Delhi: विविध मागण्यांसाठी 'चलो दिल्ली'चा नारा देत दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हरयाणाच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. पंजाब-हरयाणाच्या शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. आता शेतकऱ्यांना सीमेवरच रोखून धरल्याने हजारो आंदोलक तेथेच थांबले आहेत. तत्पूर्वी आंदोलकांनी अडथळे भेदून जाण्याचा एक प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर परत अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची ही पद्धत योग्य नसल्याचे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे. 

आंदोलक शेतकऱ्यांच्या एका गटाने बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. काही शेतकऱ्यांनी तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. आंदोलन कुणीही करू शकते. मात्र, त्यामुळे जनतेला त्रास होणार नाही, समस्या येणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे. ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करणे योग्य नाही, असेही खट्टर यांनी म्हटले आहे.

शेतकरी ज्या पद्धतीने आंदोलन करत आहेत, त्यावर आक्षेप आहे

एखादी मागणी करणे, त्या मागणीसाठी दिल्लीत धरणे देणे हा आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र, त्यामागचा हेतूही पाहायला हवा. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या सगळ्या गोष्टी पाहत आहोत. सीमांवर ताबा मिळवला आहे. या अशा आंदोलनाचा सर्वांना त्रास होत आहे. हे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करणे योग्य नाही. ट्रॅक्टर हे प्रवासाचे साधन नाही. शेतकरी बस किंवा ट्रेनमधून येऊ शकले असते. लोकशाही पद्धतीने चर्चा केले गेली पाहिजे, जेणेकरून त्यातून तोडगा निघावा, असे खट्टर यांनी सांगितले.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी आंदोलन आणि समस्या सोडवण्याच्या मार्गावर नवी दिल्लीत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीबाबतचा तपशील लगेच मिळू शकला नाही. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणा