शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

“शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची ही पद्धत योग्य नाही”; CM मनोहरलाल खट्टर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:05 IST

Farmer Protest In Delhi: हजारो शेतकऱ्यांनी मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे.

Farmer Protest In Delhi: विविध मागण्यांसाठी 'चलो दिल्ली'चा नारा देत दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हरयाणाच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. पंजाब-हरयाणाच्या शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. आता शेतकऱ्यांना सीमेवरच रोखून धरल्याने हजारो आंदोलक तेथेच थांबले आहेत. तत्पूर्वी आंदोलकांनी अडथळे भेदून जाण्याचा एक प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर परत अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची ही पद्धत योग्य नसल्याचे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे. 

आंदोलक शेतकऱ्यांच्या एका गटाने बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. काही शेतकऱ्यांनी तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. आंदोलन कुणीही करू शकते. मात्र, त्यामुळे जनतेला त्रास होणार नाही, समस्या येणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे. ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करणे योग्य नाही, असेही खट्टर यांनी म्हटले आहे.

शेतकरी ज्या पद्धतीने आंदोलन करत आहेत, त्यावर आक्षेप आहे

एखादी मागणी करणे, त्या मागणीसाठी दिल्लीत धरणे देणे हा आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र, त्यामागचा हेतूही पाहायला हवा. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या सगळ्या गोष्टी पाहत आहोत. सीमांवर ताबा मिळवला आहे. या अशा आंदोलनाचा सर्वांना त्रास होत आहे. हे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करणे योग्य नाही. ट्रॅक्टर हे प्रवासाचे साधन नाही. शेतकरी बस किंवा ट्रेनमधून येऊ शकले असते. लोकशाही पद्धतीने चर्चा केले गेली पाहिजे, जेणेकरून त्यातून तोडगा निघावा, असे खट्टर यांनी सांगितले.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी आंदोलन आणि समस्या सोडवण्याच्या मार्गावर नवी दिल्लीत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीबाबतचा तपशील लगेच मिळू शकला नाही. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणा