शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

“शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची ही पद्धत योग्य नाही”; CM मनोहरलाल खट्टर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:05 IST

Farmer Protest In Delhi: हजारो शेतकऱ्यांनी मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे.

Farmer Protest In Delhi: विविध मागण्यांसाठी 'चलो दिल्ली'चा नारा देत दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हरयाणाच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. पंजाब-हरयाणाच्या शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. आता शेतकऱ्यांना सीमेवरच रोखून धरल्याने हजारो आंदोलक तेथेच थांबले आहेत. तत्पूर्वी आंदोलकांनी अडथळे भेदून जाण्याचा एक प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर परत अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची ही पद्धत योग्य नसल्याचे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे. 

आंदोलक शेतकऱ्यांच्या एका गटाने बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. काही शेतकऱ्यांनी तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. आंदोलन कुणीही करू शकते. मात्र, त्यामुळे जनतेला त्रास होणार नाही, समस्या येणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे. ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करणे योग्य नाही, असेही खट्टर यांनी म्हटले आहे.

शेतकरी ज्या पद्धतीने आंदोलन करत आहेत, त्यावर आक्षेप आहे

एखादी मागणी करणे, त्या मागणीसाठी दिल्लीत धरणे देणे हा आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र, त्यामागचा हेतूही पाहायला हवा. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या सगळ्या गोष्टी पाहत आहोत. सीमांवर ताबा मिळवला आहे. या अशा आंदोलनाचा सर्वांना त्रास होत आहे. हे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करणे योग्य नाही. ट्रॅक्टर हे प्रवासाचे साधन नाही. शेतकरी बस किंवा ट्रेनमधून येऊ शकले असते. लोकशाही पद्धतीने चर्चा केले गेली पाहिजे, जेणेकरून त्यातून तोडगा निघावा, असे खट्टर यांनी सांगितले.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी आंदोलन आणि समस्या सोडवण्याच्या मार्गावर नवी दिल्लीत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीबाबतचा तपशील लगेच मिळू शकला नाही. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणा