शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

शेतकरी ठाम! केंद्र सरकारचा निर्णायक प्रस्ताव फेटाळला; उद्याची बैठक महत्त्वाची ठरणार

By कुणाल गवाणकर | Updated: January 21, 2021 21:16 IST

Farmers Protest: उद्या शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकीची ११ वी फेरी; शेतकरी मागण्यांवर पूर्णपणे ठाम

नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी केंद्रानं दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. काल सरकार आणि शेतकऱ्यांचे नेते यांच्यामध्ये बैठकीची दहावी फेरी झाली. त्यावेळी सरकारनं दीड वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला. त्यामुळे शेतकरी आंदोलन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. यानंतर आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. त्यात सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. कायदे पूर्णपणे मागे घेतले जावेत, अशी मागणी सभेत करण्यात आली.कालच्या बैठकीत काय झालं?सरकार कृषी कायद्यांना एक ते दीड वर्षांपर्यंत स्थगिती देण्यात तयार असल्याचं काल झालेल्या बैठकीनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं होतं. शेतकरी संघटना केंद्र सरकारनं दिलेल्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करतील. शेतकरी यावर चर्चा करून २२ तारखेला उत्तर देतील. २२ जानेवारीला होणाऱ्या चर्चेत याबाबत काहीतरी तोडगा निश्चित निघेल, अशी आशा नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केली होती.उद्या होणार ११ वी बैठकउद्या शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बैठकीची ११ वी फेरी होणार आहे. तीन कृषी कायदे पूर्णपणे मागे घ्या. सर्व शेतकऱ्यांच्या सर्व पिकांच्या हमीभावासाठी कायदे करा, या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी