शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ठाम! केंद्र सरकारचा निर्णायक प्रस्ताव फेटाळला; उद्याची बैठक महत्त्वाची ठरणार

By कुणाल गवाणकर | Updated: January 21, 2021 21:16 IST

Farmers Protest: उद्या शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकीची ११ वी फेरी; शेतकरी मागण्यांवर पूर्णपणे ठाम

नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी केंद्रानं दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. काल सरकार आणि शेतकऱ्यांचे नेते यांच्यामध्ये बैठकीची दहावी फेरी झाली. त्यावेळी सरकारनं दीड वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला. त्यामुळे शेतकरी आंदोलन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. यानंतर आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. त्यात सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. कायदे पूर्णपणे मागे घेतले जावेत, अशी मागणी सभेत करण्यात आली.कालच्या बैठकीत काय झालं?सरकार कृषी कायद्यांना एक ते दीड वर्षांपर्यंत स्थगिती देण्यात तयार असल्याचं काल झालेल्या बैठकीनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं होतं. शेतकरी संघटना केंद्र सरकारनं दिलेल्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करतील. शेतकरी यावर चर्चा करून २२ तारखेला उत्तर देतील. २२ जानेवारीला होणाऱ्या चर्चेत याबाबत काहीतरी तोडगा निश्चित निघेल, अशी आशा नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केली होती.उद्या होणार ११ वी बैठकउद्या शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बैठकीची ११ वी फेरी होणार आहे. तीन कृषी कायदे पूर्णपणे मागे घ्या. सर्व शेतकऱ्यांच्या सर्व पिकांच्या हमीभावासाठी कायदे करा, या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी