शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Farmers Protest : शेतकऱ्यांचे पुन्हा 'चलो दिल्ली', दिल्लीच्या सर्व सीमा सील, हरयाणात 2 स्टेडियमचे जेलमध्ये रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 10:00 IST

Farmers Protest : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांच्या 'चलो दिल्ली' मोर्चाबाबत हरयाणा आणि दिल्लीतील पोलीस हाय अलर्टवर आहेत. मंगळवारी होणारा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी सिंघू आणि गाझीपूरसह दिल्लीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. या सीमांवर काँक्रीटचे अडथळे, रस्त्यावर टाकलेले टोकदार अडथळे आणि काटेरी तारा लावून या सीमांचे किल्ल्यात रूपांतर करण्यात आले आहे. 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रविवारी राष्ट्रीय राजधानीच्या उत्तर-पूर्व जिल्ह्यात कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांनी आंदोलकांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीच्या सीमेवर पोलिसांचा तपास तीव्र करण्यात आला आहे. ईशान्य दिल्लीचे पोलिस उपायुक्त जॉय तिर्की यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, 'कोणालाही कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करण्याची परवानगी दिली जाणार नाही.'

हरयाणाच्या अधिकाऱ्यांनी अंबालाजवळील शंभू येथे पंजाबची सीमा सील केली आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा थांबवण्यासाठी जिंद आणि फतेहाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने सिरसा येथील चौधरी दलबीर सिंग इनडोअर स्टेडियम आणि डबवलीचे गुरु गोविंद सिंग स्टेडियमचे रूपांतर तात्पुरत्या तुरुंगात केले आहे. गोंधळ घालणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करून याठिकाणी आणले जाऊ शकते. 

याचबरोबर, शांतता बिघडण्याच्या भीतीमुळे हरयाणा सरकारने अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा या सात जिल्ह्यांमध्ये ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान मोबाईल इंटरनेट सेवा आणि एकाधिक एसएमएस पाठविण्यावर बंदी घातली आहे. तसेच, आंदोलकांनी पोलिस बॅरिकेड उडी मारू नये, यासाठी घग्गर उड्डाणपुलावर रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी पत्रे बसविण्यात आले आहेत. जल तोफ आणि दंगलविरोधी 'वज्र' वाहने तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच घग्गर नदीचे पात्रही आंदोलकांना पायी जाता येऊ नये, यासाठी खोदण्यात आले आहे. मात्र, काही लोक पायीच नदी पार करताना दिसून आले. 

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?MSP साठी कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामुळे हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणा