शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Farmers Protest : शेतकऱ्यांचे पुन्हा 'चलो दिल्ली', दिल्लीच्या सर्व सीमा सील, हरयाणात 2 स्टेडियमचे जेलमध्ये रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 10:00 IST

Farmers Protest : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांच्या 'चलो दिल्ली' मोर्चाबाबत हरयाणा आणि दिल्लीतील पोलीस हाय अलर्टवर आहेत. मंगळवारी होणारा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी सिंघू आणि गाझीपूरसह दिल्लीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. या सीमांवर काँक्रीटचे अडथळे, रस्त्यावर टाकलेले टोकदार अडथळे आणि काटेरी तारा लावून या सीमांचे किल्ल्यात रूपांतर करण्यात आले आहे. 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रविवारी राष्ट्रीय राजधानीच्या उत्तर-पूर्व जिल्ह्यात कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांनी आंदोलकांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीच्या सीमेवर पोलिसांचा तपास तीव्र करण्यात आला आहे. ईशान्य दिल्लीचे पोलिस उपायुक्त जॉय तिर्की यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, 'कोणालाही कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करण्याची परवानगी दिली जाणार नाही.'

हरयाणाच्या अधिकाऱ्यांनी अंबालाजवळील शंभू येथे पंजाबची सीमा सील केली आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा थांबवण्यासाठी जिंद आणि फतेहाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने सिरसा येथील चौधरी दलबीर सिंग इनडोअर स्टेडियम आणि डबवलीचे गुरु गोविंद सिंग स्टेडियमचे रूपांतर तात्पुरत्या तुरुंगात केले आहे. गोंधळ घालणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करून याठिकाणी आणले जाऊ शकते. 

याचबरोबर, शांतता बिघडण्याच्या भीतीमुळे हरयाणा सरकारने अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा या सात जिल्ह्यांमध्ये ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान मोबाईल इंटरनेट सेवा आणि एकाधिक एसएमएस पाठविण्यावर बंदी घातली आहे. तसेच, आंदोलकांनी पोलिस बॅरिकेड उडी मारू नये, यासाठी घग्गर उड्डाणपुलावर रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी पत्रे बसविण्यात आले आहेत. जल तोफ आणि दंगलविरोधी 'वज्र' वाहने तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच घग्गर नदीचे पात्रही आंदोलकांना पायी जाता येऊ नये, यासाठी खोदण्यात आले आहे. मात्र, काही लोक पायीच नदी पार करताना दिसून आले. 

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?MSP साठी कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामुळे हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणा