शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चौथी बैठक निष्फळ, आंदोलन चिघळले; बॅरिकेड तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आणल्या JCB मशीन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 20:41 IST

सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांचा प्रस्ताव मांडला, मात्र त्यांनी त्यास नकार दिला.

Farmer Protest Delhi: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. किमान आधारभूत किमती(MSP)सह डझनभर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीत घुसण्याची तयारी सुरू केली आहे. रविवारी शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीची बैठक झाली, त्यात सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांचा प्रस्ताव मांडला, मात्र यावर एकमत झाले नाही. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चाची तयारी सुरू केली आहे.

आंदोलक शेतकरी सध्या शंभू सीमेवर ठाण मांडून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त शेतकरी उद्या दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. रस्त्यावरील पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्यासाठी जेसीबी आणि पोकलेन मशीन घेऊन शेतकरी दाखल झाले आहेत. पोलिसांच्या अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबर बुलेटपासून मशीन ऑपरेटर्सचे संरक्षण करण्यासाठी या मशीन्समध्येही बदल करण्यात आले आहेत. संपूर्ण केबिन लोखंडी जाड पत्र्यांनी फुलप्रूफ करण्यात आली आहे. 

7-8 मशीन शंभू सीमेवर पोहोचल्यामिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी अशी सुमारे 7 ते 8 मशिन तयार केली आहेत, जी पंजाब आणि हरियाणा, शंभू, खन्नौरी आणि डबवली सीमेवर तैनात करण्यात आली आहेत. बॅरिकेड्स तोडून ट्रॉलीसाठी मार्ग तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल.

चौथ्या बैठकीत तोडगा नाहीरविवारी झालेल्या चौथ्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस खरेदीसाठी किमान आधारभूत किंमत प्रस्तावित केली होती. सरकारचा हा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी सोमवारी तो प्रस्ताव फेटाळला. यानंतर शेतकऱ्यांनी बुधवारी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली. किसान मजदूर मोर्चाचे नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले की, आम्ही सरकारला आवाहन करतो की एकतर आमचे प्रश्न सोडवावे किंवा बॅरिकेड्स हटवावे आणि आम्हाला शांततापूर्ण आंदोलनासाठी दिल्लीला जाण्याची परवानगी द्यावी.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा