शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Farmer Protest: किमान हमीभाव कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा; टिकैत यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 5:34 AM

नवे कृषी कायदे मागे घ्यावेत; मागणीनुसार अन्नधान्याच्या किमती निश्चित केल्या जाव्यात

गाझियाबाद : किमान हमीभाव कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुन्हा केली आहे. केंद्राने नवे कृषी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी सरकारशी चर्चा करण्याकरिता तयार आहेत, असेही ते म्हणाले.शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेच्या भाषणात केले होते. त्यावर राकेश टिकैत म्हणाले, किमान हमीभाव कायम राहिलाच पाहिजे, ही शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. भूक, अन्नधान्याशी संबंधित प्रश्नांवर व्यापारी पद्धतीच्या वाटाघाटी कोणीही करू नयेत. असे प्रयत्न करणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे. देशामध्ये अन्नधान्याची जितकी मागणी वाढेल, त्यानुसार अन्नधान्याच्या किमती निश्चित केल्या जाव्यात. ज्याप्रमाणे विमानाच्या तिकिटांच्या दरात दिवसातून तीन-चार वेळा चढ-उतार होतात, तशा पद्धतीने शेतमालाची किंमत ठरविता येणार नाही, असेही राकेश टिकैत यांनी सांगितले. नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचा सोमवारी ७५ वा दिवस होता. ‘अभी नही तो कभी नही’ असा संकल्प शेतकरी नेत्यांनी केला आहे. (वृत्तसंस्था) इंटरनेट सेवा बंद करण्याच्या प्रकाराची सरन्यायाधीशांनी नोंद घेण्याची मागणीशेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या जागी केंद्र सरकारने इंटरनेट सेवा स्थगित केली होती. याची सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी स्वत:हून नोंद घ्यावी व कारवाई करावी, अशी विनंती त्यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते तेहसीन पूनावाला यांनी केली आहे.जगातील सर्व लोकशाही देशांत भारतामध्येच इंटरनेट सेवा स्थगित करण्याचे प्रकार अधिक वेळा घडले आहेत, असेही पूनावाला यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैत