शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

Farmer Protest: किमान हमीभाव कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा; टिकैत यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 05:34 IST

नवे कृषी कायदे मागे घ्यावेत; मागणीनुसार अन्नधान्याच्या किमती निश्चित केल्या जाव्यात

गाझियाबाद : किमान हमीभाव कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुन्हा केली आहे. केंद्राने नवे कृषी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी सरकारशी चर्चा करण्याकरिता तयार आहेत, असेही ते म्हणाले.शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेच्या भाषणात केले होते. त्यावर राकेश टिकैत म्हणाले, किमान हमीभाव कायम राहिलाच पाहिजे, ही शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. भूक, अन्नधान्याशी संबंधित प्रश्नांवर व्यापारी पद्धतीच्या वाटाघाटी कोणीही करू नयेत. असे प्रयत्न करणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे. देशामध्ये अन्नधान्याची जितकी मागणी वाढेल, त्यानुसार अन्नधान्याच्या किमती निश्चित केल्या जाव्यात. ज्याप्रमाणे विमानाच्या तिकिटांच्या दरात दिवसातून तीन-चार वेळा चढ-उतार होतात, तशा पद्धतीने शेतमालाची किंमत ठरविता येणार नाही, असेही राकेश टिकैत यांनी सांगितले. नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचा सोमवारी ७५ वा दिवस होता. ‘अभी नही तो कभी नही’ असा संकल्प शेतकरी नेत्यांनी केला आहे. (वृत्तसंस्था) इंटरनेट सेवा बंद करण्याच्या प्रकाराची सरन्यायाधीशांनी नोंद घेण्याची मागणीशेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या जागी केंद्र सरकारने इंटरनेट सेवा स्थगित केली होती. याची सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी स्वत:हून नोंद घ्यावी व कारवाई करावी, अशी विनंती त्यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते तेहसीन पूनावाला यांनी केली आहे.जगातील सर्व लोकशाही देशांत भारतामध्येच इंटरनेट सेवा स्थगित करण्याचे प्रकार अधिक वेळा घडले आहेत, असेही पूनावाला यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैत