शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यास थांबवले, तर सरकारला सत्तेत येण्यापासून रोखू”: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 21:30 IST

Rakesh Tikait: बड्या कंपन्यांना फायदा व्हावा, अशा धोरणांवर काम सुरू असल्याची टीका राकेश टिकैत यांनी केली.

Rakesh Tikait: पुढील पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस पिकांची सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने शेतकऱ्यांपुढे ठेवला. हा प्रस्ताव फेटाळत २३ पिकांना हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या महापंचायतीत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सहभाग घेतला. यावेळी संबोधित करताना राकेश टिकैत यांनी सरकारला इशारा दिला.

यापूर्वीही सरकारे होती आणि समस्याही आधीच्याच आहेत. पिकांना रास्त भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे हाल व्हावेत, अशी सरकारची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. सरकारकडून जमिनी हिसकावण्याचा डाव सुरू आहे, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली. 

बड्या कंपन्यांना फायदा व्हावा, अशा धोरणांवर काम सुरू असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला. जेव्हा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर त्याच्याकडून जाईल, त्याचे वाहन खराब होऊन तेही हातून जाईल, असे झाले की त्याचा फायदा कंपन्यांना होईल. सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखले आहे. २०२४ मध्ये सरकारला सत्तेत येण्यापासून शेतकरी रोखतील, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला. उसाची थकबाकी द्यावी, एमएसपीवर हमीभाव कायदा करावा आणि शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, सरकारच्या प्रस्तावावर आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली. या प्रस्तावामुळे आम्हाला कोणताही फायदा होणार नाही. आम्हाला २३ पिकांसाठी हमीभावाचा कायदा हवा आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीच्या दिशेने मोर्चा सुरू होईल, असे शेतकरी नेते जगजित सिंह दल्लेवाल, सर्वनसिंग पंढेर म्हणाले.

 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन