शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शेतकरी नेते म्हणाले, "गोळी किंवा शांततापूर्ण समाधान, सरकारकडून नक्कीच काहीतरी परत घेऊ"

By ravalnath.patil | Updated: December 1, 2020 21:56 IST

farmers protest : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषि कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे.

ठळक मुद्देदुपारी तीन वाजता सुरू झालेली ही बैठक संध्याकाळी सातच्या सुमारास संपली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी गेल्या सहा दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सरकार व शेतकरी नेत्यांची बैठक झाली.

दुपारी तीन वाजता सुरू झालेली ही बैठक संध्याकाळी सातच्या सुमारास संपली. यावेळी सरकारने शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. आम्ही सरकारकडून काहीतरी परत घेऊ, मग ती गोळी (बुलेट) असो किंवा शांततापूर्ण समाधान, असे एका शेतकरी नेत्यांने या बैठकीनंतर म्हटले.

मंगळवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत सहभागी झालेले शेतकरी नेते चंदा सिंग म्हणाले, "कृषी कायद्याविरूद्ध आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्ही सरकारकडून काहीतरी परत घेऊ, मग ती बुलेट असो किंवा शांततापूर्ण समाधान." तसेच, आम्ही पुन्हा चर्चेसाठी येऊ, असे चंदा सिंग यांनी सांगितले. याचबरोबर, अखिल भारतीय शेतकरी महासंघाचे अध्यक्ष प्रेमसिंह म्हणाले, "आजची बैठक चांगली झाली. ३ डिसेंबर रोजी सरकारबरोबर पुढच्या बैठकीत आम्ही त्यांना समजावू सांगू की कोणताही शेतकरी कृषी कायद्याचे समर्थन करत नाही. आमचे आंदोलन सुरूच राहील."

दुसरीकडे, आजच्या बैठकीबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, आज शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेली बैठक चांगली राहिली. आता आम्ही तीन डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. आम्ही छोटी समिती बनविण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र शेतकरी सर्वांसोबत चर्चा व्हावी यासाठी आग्रही आहेत. आम्हाला त्याबाबत काही अडचण नाही आहे. आम्ही शेतकऱ्यांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषि कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बरेच दिवस तिढा कायम राहिल्यानंतर आज शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार चर्चेसाठी समोरासमोर आले. दिल्लीतील विज्ञान भवन येथे आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमधील ही बैठक झाली. आता ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा बैठक होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली