शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभच मिळेना, गुजरातमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

By महेश गलांडे | Updated: January 5, 2021 15:35 IST

आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं.

ठळक मुद्देगुजरातमधील एक शेतकरी, शेतकरी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात, पंचायत समितीत चकरा मारत होता. मात्र, सातत्याने पाठपुराव करुनही, खेटे मारुनही योजनेचा लाभ, रक्कम मिळाली नसल्याने पीडित शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयातच स्वत:ला फासावर लटकवले

सुरत - देशात केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांना विरोध करत पंजाब आणि हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर उतरले आहेत. गेल्या महिनाभरापासून कडाक्याच्या थंडीतही त्यांचं आंदोलन सुरूच आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागत नाही, तर दुसरीकडे गुजरातमध्ये एका शेतकऱ्याने सरकारी कार्यालयातील अनास्थेमुळे आत्महत्या केली आहे. 

गुजरातमधील एक शेतकरी, शेतकरी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात, पंचायत समितीत चकरा मारत होता. मात्र, सातत्याने पाठपुराव करुनही, खेटे मारुनही योजनेचा लाभ, रक्कम मिळाली नसल्याने पीडित शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयातच स्वत:ला फासावर लटकवले. गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील ही ह्रदयद्रावक आणि सरकारी कार्यालयाची लख्तरे वेशीवर टांगणारी घटना आहे. येथील बांकोर गावचे शेतकरी बलवंत सिंह यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातच फाशी घेऊन आपली जीव दिला. या शेतकऱ्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. त्यामध्ये, आजही माझ्या अंतर्मनात बीजेपीच आहे, पण या गरीब शेतकऱ्याचं काम कुणीच केलं नाही, असे बलवंतसिंह यांनी लिहिलं आहे. 

आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, पोलिसांनीही त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे, बलवंतसिंह यांनी टोकाचे पाऊल उचलले. बलवंत सिंह यांचा मुलगा राजेंद्र भाईने माहिती देताना, वडिलांचं घराचं स्वप्न पूर्ण न झाल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत नाव आलं होतं. पण, ग्रामपंयातीकडून त्यांना आर्थिक मदत मिळालीच नाही. त्यामुळे, वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असे राजेंद्र भाई यांनी सांगितलंय.  

टॅग्स :GujaratगुजरातSuicideआत्महत्याFarmerशेतकरीPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना