शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभच मिळेना, गुजरातमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

By महेश गलांडे | Updated: January 5, 2021 15:35 IST

आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं.

ठळक मुद्देगुजरातमधील एक शेतकरी, शेतकरी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात, पंचायत समितीत चकरा मारत होता. मात्र, सातत्याने पाठपुराव करुनही, खेटे मारुनही योजनेचा लाभ, रक्कम मिळाली नसल्याने पीडित शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयातच स्वत:ला फासावर लटकवले

सुरत - देशात केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांना विरोध करत पंजाब आणि हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर उतरले आहेत. गेल्या महिनाभरापासून कडाक्याच्या थंडीतही त्यांचं आंदोलन सुरूच आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागत नाही, तर दुसरीकडे गुजरातमध्ये एका शेतकऱ्याने सरकारी कार्यालयातील अनास्थेमुळे आत्महत्या केली आहे. 

गुजरातमधील एक शेतकरी, शेतकरी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात, पंचायत समितीत चकरा मारत होता. मात्र, सातत्याने पाठपुराव करुनही, खेटे मारुनही योजनेचा लाभ, रक्कम मिळाली नसल्याने पीडित शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयातच स्वत:ला फासावर लटकवले. गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील ही ह्रदयद्रावक आणि सरकारी कार्यालयाची लख्तरे वेशीवर टांगणारी घटना आहे. येथील बांकोर गावचे शेतकरी बलवंत सिंह यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातच फाशी घेऊन आपली जीव दिला. या शेतकऱ्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. त्यामध्ये, आजही माझ्या अंतर्मनात बीजेपीच आहे, पण या गरीब शेतकऱ्याचं काम कुणीच केलं नाही, असे बलवंतसिंह यांनी लिहिलं आहे. 

आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, पोलिसांनीही त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे, बलवंतसिंह यांनी टोकाचे पाऊल उचलले. बलवंत सिंह यांचा मुलगा राजेंद्र भाईने माहिती देताना, वडिलांचं घराचं स्वप्न पूर्ण न झाल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत नाव आलं होतं. पण, ग्रामपंयातीकडून त्यांना आर्थिक मदत मिळालीच नाही. त्यामुळे, वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असे राजेंद्र भाई यांनी सांगितलंय.  

टॅग्स :GujaratगुजरातSuicideआत्महत्याFarmerशेतकरीPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना