शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शेतकरी आंदोलन संपणार ? आज सिंघू सीमेपर 40 शेतकरी संघटनांची महत्वपूर्ण बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 09:50 IST

काही शेतकरी संघटना आंदोलन संपवण्याच्या बाजूने आहेत, तर काही संघटनांना इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरुच ठेवायचे आहे.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची(Farm Laws Repealed) घोषणा केली होती. त्यानंतर हिवाळी अदिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे कायदे परत घेणारे विधेयक मंजूर झाले. पण अद्याप शेतकऱ्यांचे आंदोलन संपलेले नाही. यातच शेतकरी आंदोलनात फूट पडल्याच्या बातम्याही येत आहेत. आता आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सिंधू सीमेवर 40 शेतकरी संघटनांची मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलन मागे घेणे आणि MSP समितीच्या स्थापनेवर चर्चा होणार आहे. 

काही मीडिया रिपोर्टनुसार, पंजाबमधील अनेक शेतकरी संघटना आंदोलनाच्या विजयानंतर संप मागे घेण्याच्या बाजूने आहेत. तर अनेक शेतकरी संघटनांना एमएसपी कायदा आणि खटले मागे घेण्यासह अन्य मागण्यांसाठी संप सुरुच ठेवायचा आहे. माघार घेणारे पक्ष एकमत घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने रणनीती निश्चित करण्यासाठी शेतकरी संघटनांची आज महत्त्वाची बैठक होत आहे.

अनेक संघटना आंदोलन संपवण्याच्या बाजूनेकाल झालेल्या पंजाबमधील 32 संघटनांच्या बैठकीत संसदेतून कृषीविषयक कायदे मागे घेतल्याने आंदोलनाचा विजय झाला यावर एकमत झाले. तसेच, एमएसपी कायदा बनवण्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल, त्यामुळे सरकारला मुदत देऊन संप संपवावा, अशी अनेक संघटनांची मागणी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 पैकी सुमारे 20-22 संघटनांनी संप मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे, तर सुमारे 8-10 संघटना उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत थांबण्याच्या बाजूने आहेत.

केंद्राकडून प्रमुख मागण्या मंजूर ?

कृषी कायद्याला सर्वप्रथम पंजाबमधील शेतकऱ्यांनी विरोध केला होता, त्यांच्या आवाहनावर पंजाब तसेच हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलनाला सुरुवात केली. नंतर पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकरीही सामील झाले. ही चळवळ हळूहळू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरली. आकडेवारी दर्शवते की पंजाब आणि हरियाणामध्ये MSP वर देशात सर्वाधिक खरेदी होते, त्यामुळे त्यांची MSP साठी कोणतीही मोठी मागणी नव्हती. पंजाबमधील शेतक-यांचे प्राधान्य हे तीन कृषी कायदे मागे घेणे आणि गवत जाळण्यावर दंडात्मक कारवाई न करणे हे होते, केंद्र सरकारने दोन्ही मागण्या पूर्ण केल्या आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी