शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

शेतकरी आंदोलन संपणार ? आज सिंघू सीमेपर 40 शेतकरी संघटनांची महत्वपूर्ण बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 09:50 IST

काही शेतकरी संघटना आंदोलन संपवण्याच्या बाजूने आहेत, तर काही संघटनांना इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरुच ठेवायचे आहे.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची(Farm Laws Repealed) घोषणा केली होती. त्यानंतर हिवाळी अदिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे कायदे परत घेणारे विधेयक मंजूर झाले. पण अद्याप शेतकऱ्यांचे आंदोलन संपलेले नाही. यातच शेतकरी आंदोलनात फूट पडल्याच्या बातम्याही येत आहेत. आता आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सिंधू सीमेवर 40 शेतकरी संघटनांची मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलन मागे घेणे आणि MSP समितीच्या स्थापनेवर चर्चा होणार आहे. 

काही मीडिया रिपोर्टनुसार, पंजाबमधील अनेक शेतकरी संघटना आंदोलनाच्या विजयानंतर संप मागे घेण्याच्या बाजूने आहेत. तर अनेक शेतकरी संघटनांना एमएसपी कायदा आणि खटले मागे घेण्यासह अन्य मागण्यांसाठी संप सुरुच ठेवायचा आहे. माघार घेणारे पक्ष एकमत घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने रणनीती निश्चित करण्यासाठी शेतकरी संघटनांची आज महत्त्वाची बैठक होत आहे.

अनेक संघटना आंदोलन संपवण्याच्या बाजूनेकाल झालेल्या पंजाबमधील 32 संघटनांच्या बैठकीत संसदेतून कृषीविषयक कायदे मागे घेतल्याने आंदोलनाचा विजय झाला यावर एकमत झाले. तसेच, एमएसपी कायदा बनवण्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल, त्यामुळे सरकारला मुदत देऊन संप संपवावा, अशी अनेक संघटनांची मागणी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 पैकी सुमारे 20-22 संघटनांनी संप मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे, तर सुमारे 8-10 संघटना उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत थांबण्याच्या बाजूने आहेत.

केंद्राकडून प्रमुख मागण्या मंजूर ?

कृषी कायद्याला सर्वप्रथम पंजाबमधील शेतकऱ्यांनी विरोध केला होता, त्यांच्या आवाहनावर पंजाब तसेच हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलनाला सुरुवात केली. नंतर पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकरीही सामील झाले. ही चळवळ हळूहळू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरली. आकडेवारी दर्शवते की पंजाब आणि हरियाणामध्ये MSP वर देशात सर्वाधिक खरेदी होते, त्यामुळे त्यांची MSP साठी कोणतीही मोठी मागणी नव्हती. पंजाबमधील शेतक-यांचे प्राधान्य हे तीन कृषी कायदे मागे घेणे आणि गवत जाळण्यावर दंडात्मक कारवाई न करणे हे होते, केंद्र सरकारने दोन्ही मागण्या पूर्ण केल्या आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी