शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकला केंद्र सरकारने विचारले प्रश्न; भारतीयांच्या डेटाचा गैरवापर झाला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:46 IST

सुरक्षिततेचे काय उपाय केले?

नवी दिल्ली : भारतीयांची फेसबुकवरील माहिती चोरून गैरवापर करणाऱ्या ब्रिटनच्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीला गेल्या आठवड्यात नोटीस पाठविल्यानंतर, आता केंद्र सरकारने या प्रकरणी फेसबुकलाही नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सरकारने फेसबुकला पाच प्रश्न विचारले असून, त्यांची उत्तरे ७ एप्रिलपर्यंत द्यावीत, असे सांगण्यात आले आहे. भारतीय मतदारांची वैयक्तिक माहिती चोरून, तिचा देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी वापर करण्यात आला आहे का, तसेच या माहितीचा गैरवापर होऊ नये, म्हणून काही उपाय योजण्यात आले आहेत का, अशी विचारणा फेसबुककडे केंद्र सरकारने केली आहे.गेल्या आठवड्यात केंब्रिज अ‍ॅनालिटिकाला पाठविलेल्या नोटिशीत केंद्र सरकारने त्या कंपनीला सहा प्रश्न विचारले होते. भारतीयांचीचोरलेली वैयक्तिक माहिती कोणत्या कारणांसाठी व कोणत्या व्यक्ती किंवा संस्थांकरिता वापरली गेली, त्यांची नावे कळवा, अशी विचारणा त्यात करण्यात आली आहे.२०१०च्या बिहार निवडणुकांसाठीजनता दल (यू) या पक्षासाठी मतदारांसंदर्भातील माहिती मिळवून देण्याचे काम, केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने केले होते, असे या कंपनीतील माजी कर्मचारी ख्रिस्तोफर वायली याने बुधवारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. केंब्रिज अ‍ॅनालिटिकाची पालक कंपनी एससीएलने उत्तर प्रदेशमधील जातीनिहाय केलेल्या सर्वेक्षणाची माहितीही या पक्षाने विकत घेतली होती, असेही त्याने म्हटले आहे. मात्र, वायलीने केलेल्या दाव्याचा जनता दल (यू)ने स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.केंब्रिज अ‍ॅनालिटीकाला एका भारतीय-अमेरिकी अब्जाधीशाने निधी पुरविला होता. भारतात काँग्रेसचा पराभव व्हावा, अशी या अब्जाधीशाची इच्छा होती, असा नवा दावा ख्रिस्टोफर वायली याने आपल्या जबाबात केला आहे.

टॅग्स :FacebookफेसबुकCambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिका