शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

फेसबुकला केंद्र सरकारने विचारले प्रश्न; भारतीयांच्या डेटाचा गैरवापर झाला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:46 IST

सुरक्षिततेचे काय उपाय केले?

नवी दिल्ली : भारतीयांची फेसबुकवरील माहिती चोरून गैरवापर करणाऱ्या ब्रिटनच्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीला गेल्या आठवड्यात नोटीस पाठविल्यानंतर, आता केंद्र सरकारने या प्रकरणी फेसबुकलाही नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सरकारने फेसबुकला पाच प्रश्न विचारले असून, त्यांची उत्तरे ७ एप्रिलपर्यंत द्यावीत, असे सांगण्यात आले आहे. भारतीय मतदारांची वैयक्तिक माहिती चोरून, तिचा देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी वापर करण्यात आला आहे का, तसेच या माहितीचा गैरवापर होऊ नये, म्हणून काही उपाय योजण्यात आले आहेत का, अशी विचारणा फेसबुककडे केंद्र सरकारने केली आहे.गेल्या आठवड्यात केंब्रिज अ‍ॅनालिटिकाला पाठविलेल्या नोटिशीत केंद्र सरकारने त्या कंपनीला सहा प्रश्न विचारले होते. भारतीयांचीचोरलेली वैयक्तिक माहिती कोणत्या कारणांसाठी व कोणत्या व्यक्ती किंवा संस्थांकरिता वापरली गेली, त्यांची नावे कळवा, अशी विचारणा त्यात करण्यात आली आहे.२०१०च्या बिहार निवडणुकांसाठीजनता दल (यू) या पक्षासाठी मतदारांसंदर्भातील माहिती मिळवून देण्याचे काम, केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने केले होते, असे या कंपनीतील माजी कर्मचारी ख्रिस्तोफर वायली याने बुधवारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. केंब्रिज अ‍ॅनालिटिकाची पालक कंपनी एससीएलने उत्तर प्रदेशमधील जातीनिहाय केलेल्या सर्वेक्षणाची माहितीही या पक्षाने विकत घेतली होती, असेही त्याने म्हटले आहे. मात्र, वायलीने केलेल्या दाव्याचा जनता दल (यू)ने स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.केंब्रिज अ‍ॅनालिटीकाला एका भारतीय-अमेरिकी अब्जाधीशाने निधी पुरविला होता. भारतात काँग्रेसचा पराभव व्हावा, अशी या अब्जाधीशाची इच्छा होती, असा नवा दावा ख्रिस्टोफर वायली याने आपल्या जबाबात केला आहे.

टॅग्स :FacebookफेसबुकCambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिका