शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

१६०० किमी पायी आलेल्या मुलाला कुटुंबाने प्रवेश नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 06:28 IST

रक्ताची नाती झाली परकी : मुंबईहून वाराणसीला गेलेल्या तरुणाची कथा; पोलिसांनी केले ‘क्वारंटाईन’

वाराणसी : ‘लॉकडाऊन’मुळे रोजीरोटी बंद झाल्याने मुंबईहून १,६०० किमी चालत वाराणसीमध्ये घरी आल्यावर आई व भावाने घरात राहण्यास नकार दिल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने रविवारी या तरुणाला शहरातील इस्पितळात ‘क्वारंटाईन’ केले आहे. कोरोनाने सध्या भयग्रस्त वातावरणात रक्ताची नातीही कशी दुरावतात याची ही कथा; अशोक नावाच्या एका २५ वर्षाच्या तरुणाची आहे. अशोकचे घर वाराणसी शहराच्या गोला दिनानाथ वस्तीत आहे. चार महिन्यांपूर्वी पोट भरण्यासाठी तो मुंबईत आला. नागपाडा येथील एका हॉटेलात त्याला वेटरची नोकरी मिळाली.

जरा कुठे बस्तान बसते तोच कोरोनाची साथ सुरु झाली आणि ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्यावर तो नोकरी करायचा ते हॉटेलही बंद झाले त्यामुळे अशोकने घरी परत जाण्याचे ठरविले. चांदिवली येथे अशोक जेथे राहायचा तेथील आणखी पाच मुले त्याच्याच जवळपासच्या गावातील होती. सर्वांचीच रोजीरोटी बंद झाली होती. त्या सर्वांनी एकमेकांच्या सोबतीने चालत घरी जाण्याचे ठरविले. रस्ता शोधणे कठीण असल्याने गावाला जाणारी रेल्वे ज्या वाटेने जाते त्या रेल्वेमार्गातून ते मार्गक्रमण करत राहिले.मुंबईहून निघताना अशोकने घरी कळविले नव्हते. पण वाराणसी रेल्वे स्टेशनपाशी पोहोचल्यावर मात्र त्याला राहवले नाही.

‘थोड्याच वेळात घरी येतोय’, असा त्याने आईला फोन केला. आईला आनंद होईल, आश्चर्य वाटेल, ही त्याची अपेक्षा पार धुळीला मिळाली.‘घरी आलास तरी घरात घेणार नाही’, असे आईने त्याला सांगितले! अशोक बेजबाबदारीने वागला, असेही नाही. घरी जाण्याआधी त्याने दीनदयाल इस्पितळात जाऊन स्क्रीनिंग व तपासणी केली. कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती तरी त्यांनी अशोकला १४ दिवस घरीच ‘क्वारंटाईन’मध्ये राहण्यास सांगितले. पोलीस आता अशोकसोबत मुंबईहून चालत आलेल्या इतर पाच जणांची माहिती घेऊन त्यांना शोधून त्यांचेही स्क्रीनिंग करून चाचण्या घेण्याच्या कामाला लागले आहेत. (वृत्तसंस्था)घराचा दरवाजाही उघडला नाहीच्अशोक मुंबईहून परत येतोय, ही बातमी वाऱ्यासारखी सर्व वस्तीमध्ये पसरली. येताना कोरोना बरोबर घेऊन आला असेल तर आपल्यालाही लागण होईल. शिवाय पोलिसांचा ससेमिरा निष्कारण मागे लागेल, असा विचार करून घरच्यांनी घरी येऊ नको, असे सांगितले होतेच. शेजाºया-पाजाऱ्यांचेही तेच मत पडले. त्यांनी अशोकच्या आगमनाची माहिती पोलिसांना कळविली.च्अशोक घरी आला. पण आई आणि भावाने दरवाजाही उघडला नाही. बरीच विनवणी करून ते ऐकत नाहीत म्हटल्यावर अशोक वाराणसीमध्येच कटुआपुरा भागात त्याच्या आजोळी गेला.च्तेथेही त्याला कोणी थारा द्यायला तयार झाले नाही. शेवटी एवढ्या लांब चालत आल्यावर ‘ना घर का, ना घाट का’ अशी अशोकची दयनीय अवस्था पाहून जिल्हा पोलीस प्रशासनाने रविवारी दुपारी त्याची १४ दिवसांच्या ‘क्वारंटाईन’साठी शहराच्या मैदागीन भागातील एका खासगी इस्पितळात व्यवस्था केली.अशोकची तब्येत ठीक आहे; पण एवढ्या लांब चालत आल्याने त्याला कमालीचा थकवा आला आहे.-महेश पांडे, पोलीस निरीक्षक, कोतवाली, वाराणसी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई