शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

लाखो स्थलांतरित मजुरांच्या हालअपेष्टा खोट्या बातम्यांमुळे;माध्यमांनी जबाबदारीने वागण्याची सुप्रीम कोर्टाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 06:36 IST

परिणामी त्यांचे अतोनात हाल झाले व त्यांच्यापैकी काहींना हकनाक प्राणही गमवावा लागला, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने तीन आठवड्यांचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात तो तीन महिन्यांपर्यंत सुरू राहील, अशा आशयाच्या खोट्या बातम्या व अफवांचे देशभर पेव फुटणे हे परराज्यांमध्ये मोलमजुुरी करणाऱ्या लाखो स्थलांतरित मजुरांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याचे मुख्य कारण होते. त्यामुळेच ते जीव धोक्यात घालून शेकडो कि.मी. चालत घरी जायला निघाले.

परिणामी त्यांचे अतोनात हाल झाले व त्यांच्यापैकी काहींना हकनाक प्राणही गमवावा लागला, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. याविषयी केलेल्या दोन जनहित याचिकांवर सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने दिलेले आठपानी आदेशवजा निकालपत्र मंगळवारी रात्री न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले.

देशावर घोर आपत्ती आलेली असताना वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमांतून पसरलेल्या खोट्या बातम्या व अफवांमुळे उडालेला हाहाकार मूळ आपत्तीएवढाच गंभीर असल्याने तो दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. म्हणून सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा व अन्य कायद्यान्वये याचा वेळच्या वेळी व कठोरपणे बंदोबस्त करायला हवा, असे न्यायालयाने नमूद केले.

माध्यमांच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करण्याची आमची इच्छा नाही; परंतु त्यांनी हे स्वातंत्र्य उपभोगताना ज्यायोगे लोकांमध्ये सर्वदूर घबराट पसरेल अशा सांगोवांगी माहितीवर आधारित बातम्या प्रसारित होण्याचे टाळून आपल्या जबाबदारीचे गांभीर्याने भान ठेवावे. महामारीच्या अनुषंगाने सर्व प्रकारची साधक-बाधक चर्चा जरूर करावी, पण त्याचबरोबर सरकारकडून दिल्या जाणाºया अधिकृत माहितीसही ठळकपणे स्थान द्यावे. यासाठी सर्व माध्यमांतून एक दैनंदिन बुलेटिन काढण्याची व्यवस्था सरकार करीत आहे. माध्यमांनी त्याचा जरूर उपयोग करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्देशानुार माध्यम सूचना विभागाने बुधवारी कोविड-१९ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधी बुधवारी दैनंदिन वार्तापत्र जारी केले.

खोट्या बातम्या विषाणूंहून घातक'

खोट्या बातम्या व अफवांमुळे कसा भयंकर हाहाकार होऊ शकतो याचा संदर्भ देताना न्यायालयाने जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. तेद्रॉस अ‍ॅधेनॉम घेब्रेयेसस यांचे एक ताजे वक्तव्य उद््धृत केले. ते असे, ‘आपण सध्या फक्त एका साथीलाच नव्हे, तर त्यासंबंधात पसरविल्या जाणाºया (चुकीच्या) माहितीच्या महापुरालाही सामोरे जात आहोत. खोट्या बातम्या विषाणूपेक्षाही अधिक वेगाने व सहजपणे पसरतात व त्या विषाणूंएवढ्याच घातक असतात.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMediaमाध्यमे