शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विवाहबाह्य संबंधांचे खोटे आरोप ठरतात पतीच्या मानसिक त्रासाचे कारण - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 15:07 IST

आपल्या पतीला वारंवार आत्महत्या करण्याची धमकी देणा-या पत्नीसोबत राहणं धोकादायक असल्याचंही उच्च न्यायालयाने यावेळी नमूद केलं

नवी दिल्ली - पतीवर करण्यात येणारे खोटे आरोप त्याच्या मानसिक त्रासाचे कारण ठरतात असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आपल्या पतीला वारंवार आत्महत्या करण्याची धमकी देणा-या पत्नीसोबत राहणं धोकादायक असल्याचंही उच्च न्यायालयाने यावेळी नमूद केलं. विभक्त झालेल्या दांपत्याच्या घटस्फोटाला अनुमती दिल्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवताना उच्च न्याललयाने हा मुद्दा मांडला. पत्नी पतीसोबत अत्यंत क्रूरतेने वागत असल्या कारणाने न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं. 

न्यायालयाने यावेळी सांगितलं की, 'आम्ही आतापर्यंत केलेल्या निरीक्षणानुसार अशा प्रकारचे विवाहबाह्य संबंधांचे खोटे आरोप पतीसाठी मानसिक त्रासाचं कारण ठरतात'.

न्यायाधीस सिद्धार्थ मृदूल आणि दिपा शर्मा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी नमूद केलं की, 'असे आरोप गंभीर असतात आणि यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. अशा गोष्टीमुळे संबंधित व्यक्तीला फार मोठा धक्का बसतो. सोबतच शंका निर्माण होते की, अशा पत्नीसोबत राहणं धोकादायक आहे. खासकरुन जेव्हा ती आत्महत्या करण्याची धमकी देते'. महिलेने आपल्या पतीचे आपल्या बहिणीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला होता.