शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला तीन लाख कोटी खर्च करण्यात अपयश; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 04:06 IST

धक्कादायक आर्थिक अराजकाचे हे उदाहरण, अपयशामागची कारणे काय?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकार २०१५ पासून तीन लाख कोटींपेक्षा जास्त कराची रक्कम वापरण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. मोदी सरकारचे हे धक्कादायक, असे आर्थिक अराजक आहे, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला टिष्ट्वटरवर म्हणाले. प्रसारमाध्यमात आलेल्या बातमीचा आधार घेऊन सूरजेवाला यांनी दावा केला की, ‘आर्थिक वर्ष २०१५ आणि २०२० दरम्यान उपयोगात न आलेला आणि पडून असलेला एकत्रित निधी (सीएफआय) हा ३.५९ लाख कोटी रुपयांचा आहे.’ ‘हे आर्थिक अराजकाचे धक्कादायक उदाहरण आहे. २०१४-२०१५ ते २०१९-२०२० दरम्यान मोदी सरकारला तब्बल ३,५९,००० कोटी रुपयांच्या कर रकमेचा उपयोग करण्यात अपयश आले आहे. ही केवळ आर्थिक अकार्यक्षमता आहे,’ असे सूरजेवाला म्हणाले. मोदी सरकारने मारहाण केली, लाठीमार केला, परवडणारे शिक्षण द्या असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा वापर केला. केंद्रीय विद्यापीठांमध्ये वाढीव परीक्षा शुल्क परत देण्यास मोदी सरकारने नकार दिला व त्याचवेळी सरकार २०१४-२०१५ ते २०१९-२०२० दरम्यान उच्च शिक्षण कर म्हणून गोळा केलेले ४९,१०१ कोटी रुपये खर्च करण्यात अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले. या अपयशामागची कारणे काय आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.हवेच्या प्रदूषणामुळे भारताचा श्वास गुदमरतो आहे, दिल्ली आणि अनेक शहरे ही गॅस चेंबर्स बनली आहेत आणि २१ व्या शतकात प्रदूषण हे एकमेव सगळ्यात मोठे आव्हान बनले आहे. तरीही मोदी सरकार २०१४-२०१५ आणि २०१९-२०२० दरम्यान स्वच्छ ऊर्जा कर म्हणून गोळा केलेल्या ३८,९४३ कोटी रुपयांचा उपयोग करू शकण्यात अपयशी ठरले आहे, असे सूरजेवाला म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी