शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

मोदी सरकारला तीन लाख कोटी खर्च करण्यात अपयश; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 04:06 IST

धक्कादायक आर्थिक अराजकाचे हे उदाहरण, अपयशामागची कारणे काय?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकार २०१५ पासून तीन लाख कोटींपेक्षा जास्त कराची रक्कम वापरण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. मोदी सरकारचे हे धक्कादायक, असे आर्थिक अराजक आहे, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला टिष्ट्वटरवर म्हणाले. प्रसारमाध्यमात आलेल्या बातमीचा आधार घेऊन सूरजेवाला यांनी दावा केला की, ‘आर्थिक वर्ष २०१५ आणि २०२० दरम्यान उपयोगात न आलेला आणि पडून असलेला एकत्रित निधी (सीएफआय) हा ३.५९ लाख कोटी रुपयांचा आहे.’ ‘हे आर्थिक अराजकाचे धक्कादायक उदाहरण आहे. २०१४-२०१५ ते २०१९-२०२० दरम्यान मोदी सरकारला तब्बल ३,५९,००० कोटी रुपयांच्या कर रकमेचा उपयोग करण्यात अपयश आले आहे. ही केवळ आर्थिक अकार्यक्षमता आहे,’ असे सूरजेवाला म्हणाले. मोदी सरकारने मारहाण केली, लाठीमार केला, परवडणारे शिक्षण द्या असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा वापर केला. केंद्रीय विद्यापीठांमध्ये वाढीव परीक्षा शुल्क परत देण्यास मोदी सरकारने नकार दिला व त्याचवेळी सरकार २०१४-२०१५ ते २०१९-२०२० दरम्यान उच्च शिक्षण कर म्हणून गोळा केलेले ४९,१०१ कोटी रुपये खर्च करण्यात अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले. या अपयशामागची कारणे काय आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.हवेच्या प्रदूषणामुळे भारताचा श्वास गुदमरतो आहे, दिल्ली आणि अनेक शहरे ही गॅस चेंबर्स बनली आहेत आणि २१ व्या शतकात प्रदूषण हे एकमेव सगळ्यात मोठे आव्हान बनले आहे. तरीही मोदी सरकार २०१४-२०१५ आणि २०१९-२०२० दरम्यान स्वच्छ ऊर्जा कर म्हणून गोळा केलेल्या ३८,९४३ कोटी रुपयांचा उपयोग करू शकण्यात अपयशी ठरले आहे, असे सूरजेवाला म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी