शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

मोदी सरकारला तीन लाख कोटी खर्च करण्यात अपयश; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 04:06 IST

धक्कादायक आर्थिक अराजकाचे हे उदाहरण, अपयशामागची कारणे काय?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकार २०१५ पासून तीन लाख कोटींपेक्षा जास्त कराची रक्कम वापरण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. मोदी सरकारचे हे धक्कादायक, असे आर्थिक अराजक आहे, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला टिष्ट्वटरवर म्हणाले. प्रसारमाध्यमात आलेल्या बातमीचा आधार घेऊन सूरजेवाला यांनी दावा केला की, ‘आर्थिक वर्ष २०१५ आणि २०२० दरम्यान उपयोगात न आलेला आणि पडून असलेला एकत्रित निधी (सीएफआय) हा ३.५९ लाख कोटी रुपयांचा आहे.’ ‘हे आर्थिक अराजकाचे धक्कादायक उदाहरण आहे. २०१४-२०१५ ते २०१९-२०२० दरम्यान मोदी सरकारला तब्बल ३,५९,००० कोटी रुपयांच्या कर रकमेचा उपयोग करण्यात अपयश आले आहे. ही केवळ आर्थिक अकार्यक्षमता आहे,’ असे सूरजेवाला म्हणाले. मोदी सरकारने मारहाण केली, लाठीमार केला, परवडणारे शिक्षण द्या असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा वापर केला. केंद्रीय विद्यापीठांमध्ये वाढीव परीक्षा शुल्क परत देण्यास मोदी सरकारने नकार दिला व त्याचवेळी सरकार २०१४-२०१५ ते २०१९-२०२० दरम्यान उच्च शिक्षण कर म्हणून गोळा केलेले ४९,१०१ कोटी रुपये खर्च करण्यात अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले. या अपयशामागची कारणे काय आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.हवेच्या प्रदूषणामुळे भारताचा श्वास गुदमरतो आहे, दिल्ली आणि अनेक शहरे ही गॅस चेंबर्स बनली आहेत आणि २१ व्या शतकात प्रदूषण हे एकमेव सगळ्यात मोठे आव्हान बनले आहे. तरीही मोदी सरकार २०१४-२०१५ आणि २०१९-२०२० दरम्यान स्वच्छ ऊर्जा कर म्हणून गोळा केलेल्या ३८,९४३ कोटी रुपयांचा उपयोग करू शकण्यात अपयशी ठरले आहे, असे सूरजेवाला म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी