शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईस्थित राजस्थानी मतांवर ‘डोळा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 04:58 IST

मुंबईत मोठ्या प्रमाणात राजस्थानी नागरिक व्यवसाय आणि नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत.

- सुहास शेलारजयपूर : मुंबईत मोठ्या प्रमाणात राजस्थानी नागरिक व्यवसाय आणि नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत. मात्र, त्यांची नाळ आजही आपल्या गावाशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी आपली नावे गावातील मतदारयाद्यांमध्येच ठेवली आहेत. भाजपा-काँग्रेच्या नेत्यांनी हे लक्षात घेत, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील राजस्थानी लोकांची मते मिळविण्यासाठी आपला मोर्चा मुंबईकडे वळविला आहे.राजस्थानी लोकांनी आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी मुंबईत आपापल्या समाजाच्या संस्था स्थापन केल्या आहेत. राजपूत, जाट, गुर्जर समाजाच्या संस्थांचे सभासद तर काही हजारांवर आहेत. शिवाय जिल्हा, तालुका, गावनिहाय संस्था व संघटना आहेत. त्यामुळे या लोकांनी जर गावी येऊन मतदानाचा हक्क बजावला, तर मतदानाची टक्केवारी वाढून त्याचा फायदा आपल्या पक्षाला होऊ शकतो, या हेतूने राजकीय नेत्यांनी या संस्थांंना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. कांग्रेसतर्फे अशोक गेहलोत, नीरज डांगी, गिरिजा व्यास; तर भाजपातर्फे ओमप्रकाश माथूर, गुलाबचंद कटारिया यांनी मुंबईत प्रमुख राजस्थानी संस्थांसोबत बैठका घेऊन आपल्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.अशोक गेहलोत व नीरज डांगी यांनी दोनदा येऊन दक्षिण मुंबई व पश्चिम उपनगरांत बैठका घेतल्या. गिरीजा व्यास यांनीही आपल्या एका दौºयाचे निमित्त साधत मुंबईत आपल्या हितचिंतकांची भेट घेतली आहे. भाजपाचे ओमप्रकाश माथूर आणि गुलाबचंद कटारिया यांना मानणारा एक वर्ग मुंबईत आहे. वसुंधरा राजे सरकारच्या काळात या दोन्ही नेत्यांनी काही बड्या व्यापाºयांना राजस्थानात ‘हातपाय पसरायला’ राजकीय व प्रशासकीय पातळीवर मदत केली होती. याचा फायदा या निवडणुकीत त्यांना होऊ शकतो. माथूर आणि कटारिया यांनीही मुंबईत येऊन आपल्या समर्थकांच्या भेटी घेतल्या आहेत. राजस्थानातील प्रचार ५ डिसेंबर रोजी संपल्यानंतर ते पुन्हा मुंबईत आपल्या परिचितांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे.‘वोट’ मिळण्यासोबतच ‘नोट’ मिळण्यासाठीही काही नेत्यांनी मुंबईतील राजस्थानी व्यापाºयांना साकडे घातल्याची चर्चा आहे. निवडणुकीत आर्थिक मदत करण्याच्या मोबदल्यात सरकार स्थापन झाल्यानंतर राजस्थानात व्यापाराचा विस्तार करण्यासाठी विशेषसवलती देण्याच्या अटीवर काही व्यापाºयांनी त्यांना मदत केल्याचीही चर्चा आहे.विशेष म्हणजे मूळ राजस्थानी असलेले मुंबईतील काही व्यापारीही यंदा विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. यात काँग्रेसतर्फे रफिक मंडेलिया (चुरु मतदारसंघ), जसाराम चौधरी (मारवाड जंक्शन); तर भाजपातर्फे ललित ओस्तवाल (बडी सादडी), नारायणसिंह देवल (राणीवाडा), पुराराम चौधरी (भीनमाल), अतुल भंसाळी (जोधपूर शहर) यांचा सामावेश आहे. यापैकी मंडेलिया आणि ओस्तवाल हे मुंबईतील नावाजलेले विकासक आहेत. शिवाय प्रसिद्ध लोखंड व्यापारी जीवाराम चौधरी हे सांचोर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.>मुंबईत उघडले पक्ष कार्यालयराणीवाडा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रतन देवासी यांनी दक्षिण मुंबईतील गिरगावात कार्यालय उघडले आहे. राणीवाडा मतदारसंघात भाजपाने मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी नारायणसिंह देवल यांना रिंगणात उतरवले आहे. देवल यांचा मुंबईस्थित राजस्थानी समाजात फार मोठा दबदबा आहे. शिवाय निवडणुकीसाठी भाजपाला मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य केल्याचीही चर्चा आहे. देवल यांचा हक्काचा मुंबईकर मतदार ‘फोडण्यासाठी’च रतन देवासी यांनी मुंबईत कार्यालय उघडले आहे.>मुंबईकर मतदारांना प्रवास खर्च :मतदारांना मुंबईतून गावी येण्यासाठी त्या-त्या मतदारसंघांतील उमेदवाराकडून प्रवास खर्च देण्याचे आश्वासन दिल्याचे कळते. शिवाय एका उमेदवाराने मुंबई ते मारवाड जाण्यासाठी खासगी बस निवडणुकीच्या आदल्या दिवशी आरक्षित केल्याचेही मुंबईस्थित एका राजस्थानी व्यक्तीने सांगितले.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक