शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

मुंबईस्थित राजस्थानी मतांवर ‘डोळा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 04:58 IST

मुंबईत मोठ्या प्रमाणात राजस्थानी नागरिक व्यवसाय आणि नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत.

- सुहास शेलारजयपूर : मुंबईत मोठ्या प्रमाणात राजस्थानी नागरिक व्यवसाय आणि नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत. मात्र, त्यांची नाळ आजही आपल्या गावाशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी आपली नावे गावातील मतदारयाद्यांमध्येच ठेवली आहेत. भाजपा-काँग्रेच्या नेत्यांनी हे लक्षात घेत, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील राजस्थानी लोकांची मते मिळविण्यासाठी आपला मोर्चा मुंबईकडे वळविला आहे.राजस्थानी लोकांनी आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी मुंबईत आपापल्या समाजाच्या संस्था स्थापन केल्या आहेत. राजपूत, जाट, गुर्जर समाजाच्या संस्थांचे सभासद तर काही हजारांवर आहेत. शिवाय जिल्हा, तालुका, गावनिहाय संस्था व संघटना आहेत. त्यामुळे या लोकांनी जर गावी येऊन मतदानाचा हक्क बजावला, तर मतदानाची टक्केवारी वाढून त्याचा फायदा आपल्या पक्षाला होऊ शकतो, या हेतूने राजकीय नेत्यांनी या संस्थांंना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. कांग्रेसतर्फे अशोक गेहलोत, नीरज डांगी, गिरिजा व्यास; तर भाजपातर्फे ओमप्रकाश माथूर, गुलाबचंद कटारिया यांनी मुंबईत प्रमुख राजस्थानी संस्थांसोबत बैठका घेऊन आपल्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.अशोक गेहलोत व नीरज डांगी यांनी दोनदा येऊन दक्षिण मुंबई व पश्चिम उपनगरांत बैठका घेतल्या. गिरीजा व्यास यांनीही आपल्या एका दौºयाचे निमित्त साधत मुंबईत आपल्या हितचिंतकांची भेट घेतली आहे. भाजपाचे ओमप्रकाश माथूर आणि गुलाबचंद कटारिया यांना मानणारा एक वर्ग मुंबईत आहे. वसुंधरा राजे सरकारच्या काळात या दोन्ही नेत्यांनी काही बड्या व्यापाºयांना राजस्थानात ‘हातपाय पसरायला’ राजकीय व प्रशासकीय पातळीवर मदत केली होती. याचा फायदा या निवडणुकीत त्यांना होऊ शकतो. माथूर आणि कटारिया यांनीही मुंबईत येऊन आपल्या समर्थकांच्या भेटी घेतल्या आहेत. राजस्थानातील प्रचार ५ डिसेंबर रोजी संपल्यानंतर ते पुन्हा मुंबईत आपल्या परिचितांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे.‘वोट’ मिळण्यासोबतच ‘नोट’ मिळण्यासाठीही काही नेत्यांनी मुंबईतील राजस्थानी व्यापाºयांना साकडे घातल्याची चर्चा आहे. निवडणुकीत आर्थिक मदत करण्याच्या मोबदल्यात सरकार स्थापन झाल्यानंतर राजस्थानात व्यापाराचा विस्तार करण्यासाठी विशेषसवलती देण्याच्या अटीवर काही व्यापाºयांनी त्यांना मदत केल्याचीही चर्चा आहे.विशेष म्हणजे मूळ राजस्थानी असलेले मुंबईतील काही व्यापारीही यंदा विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. यात काँग्रेसतर्फे रफिक मंडेलिया (चुरु मतदारसंघ), जसाराम चौधरी (मारवाड जंक्शन); तर भाजपातर्फे ललित ओस्तवाल (बडी सादडी), नारायणसिंह देवल (राणीवाडा), पुराराम चौधरी (भीनमाल), अतुल भंसाळी (जोधपूर शहर) यांचा सामावेश आहे. यापैकी मंडेलिया आणि ओस्तवाल हे मुंबईतील नावाजलेले विकासक आहेत. शिवाय प्रसिद्ध लोखंड व्यापारी जीवाराम चौधरी हे सांचोर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.>मुंबईत उघडले पक्ष कार्यालयराणीवाडा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रतन देवासी यांनी दक्षिण मुंबईतील गिरगावात कार्यालय उघडले आहे. राणीवाडा मतदारसंघात भाजपाने मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी नारायणसिंह देवल यांना रिंगणात उतरवले आहे. देवल यांचा मुंबईस्थित राजस्थानी समाजात फार मोठा दबदबा आहे. शिवाय निवडणुकीसाठी भाजपाला मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य केल्याचीही चर्चा आहे. देवल यांचा हक्काचा मुंबईकर मतदार ‘फोडण्यासाठी’च रतन देवासी यांनी मुंबईत कार्यालय उघडले आहे.>मुंबईकर मतदारांना प्रवास खर्च :मतदारांना मुंबईतून गावी येण्यासाठी त्या-त्या मतदारसंघांतील उमेदवाराकडून प्रवास खर्च देण्याचे आश्वासन दिल्याचे कळते. शिवाय एका उमेदवाराने मुंबई ते मारवाड जाण्यासाठी खासगी बस निवडणुकीच्या आदल्या दिवशी आरक्षित केल्याचेही मुंबईस्थित एका राजस्थानी व्यक्तीने सांगितले.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक