शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अतिरेकी झालेला प्राध्यापक ३६ तासांत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:19 IST

काश्मीर विद्यापीठातील एक प्राध्यापक मोहम्मद रफी भट घरातून गायब होऊन अतिरेक्यांच्या गटात सामील झाले, पण अवघ्या ३६ तासांत सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत त्यांना रविवारी प्राण गमवावे लागले. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील बडीगाम गावात चकमकीत एका घरात लपून बसलेले जे पाच अतिरेकी ठार झाले त्यात प्राध्यापक भट यांचाही समावेश होता.

श्रीनगर : काश्मीर विद्यापीठातील एक प्राध्यापक मोहम्मद रफी भट घरातून गायब होऊन अतिरेक्यांच्या गटात सामील झाले, पण अवघ्या ३६ तासांत सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत त्यांना रविवारी प्राण गमवावे लागले. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील बडीगाम गावात चकमकीत एका घरात लपून बसलेले जे पाच अतिरेकी ठार झाले त्यात प्राध्यापक भट यांचाही समावेश होता.मोहम्मद रफी भट मध्य काश्मीरच्या गंदेरबाल जिल्ह्याच्या चुंदिना गावचे रहिवासी होते व काश्मीर विद्यापीठात समाजशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कंत्राटी नोकरीस होते. भट शुक्रवारी सायंकाळी घरातून गायब झाल्यावर ते कदाचित अतिरेक्यांना जाऊन मिळाले असावेत या शंकेने कुटुंबीयांनी लगेच पोलिसांत फिर्यादही नोंदविली होती.लपून बसलेल्या जागेवरूनच प्राध्यापक भट यांनी आपले वडील फैयाज अहमद भट यांना फोन करून ‘मी आता अल्लाला प्यारा होणार आहे. काही चुकले असल्यास माफ करा’ असे सांगितले. गराडा घातलेले सुरक्षा दलांचे अधिकारी चकमकीच्या जागेतून बाहेर जाणारे टेलिफोन ‘मॉनिटर’ करीतच होते. भट यांनी केलेल्या फोनवरून तेही अतिरेक्यांमध्ये असल्याची पोलिसांना खात्री होती. पोलीस भट यांच्या घरी गेले व कुटुंबीयांनी भट यांना शरण येण्याचे आवाहन करावे यासाठी त्यांचे वडील, आई व पत्नीला सोबत घेऊन निघाले. काही झाले तरी तो शस्त्र हाती घेणार नाही, अशी वडिलांनी पोलिसांना खात्री दिली. मात्र, १८ किमीपर्यंत ते पोहोेचले व पोलिसांच्या वायरलेसवरून रफी चकमकीत मारला गेल्याची बातमी आली. (वृत्तसंस्था)पूर्वीपासूनच अतिरेकी प्रवृत्तीमारल्या गेलेल्या प्राध्यापक भट यांचा अतिरेकी कल पूर्वीही दिसून आला होता. काश्मीरवर अन्याय होतो म्हणून त्याच्या वडिलांनाही बंडखोरांबद्दल सहानुभूती होती, पण त्यांनी कधी उघडपणे सरकारविरोधी कारवाया केल्या नाहीत. १८ वर्षांचे असताना मोहम्मद रफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेले होते. घरच्या लोकांनी त्यांना मन वळवून परत आणले. पुढे ते पी.एचडीपर्यंत शिकले, प्राध्यापक झाले व त्यांचे लग्नही झाले. तरी मूळ पिंड गेला नाही.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान