शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

अतिरेकी झालेला प्राध्यापक ३६ तासांत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:19 IST

काश्मीर विद्यापीठातील एक प्राध्यापक मोहम्मद रफी भट घरातून गायब होऊन अतिरेक्यांच्या गटात सामील झाले, पण अवघ्या ३६ तासांत सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत त्यांना रविवारी प्राण गमवावे लागले. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील बडीगाम गावात चकमकीत एका घरात लपून बसलेले जे पाच अतिरेकी ठार झाले त्यात प्राध्यापक भट यांचाही समावेश होता.

श्रीनगर : काश्मीर विद्यापीठातील एक प्राध्यापक मोहम्मद रफी भट घरातून गायब होऊन अतिरेक्यांच्या गटात सामील झाले, पण अवघ्या ३६ तासांत सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत त्यांना रविवारी प्राण गमवावे लागले. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील बडीगाम गावात चकमकीत एका घरात लपून बसलेले जे पाच अतिरेकी ठार झाले त्यात प्राध्यापक भट यांचाही समावेश होता.मोहम्मद रफी भट मध्य काश्मीरच्या गंदेरबाल जिल्ह्याच्या चुंदिना गावचे रहिवासी होते व काश्मीर विद्यापीठात समाजशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कंत्राटी नोकरीस होते. भट शुक्रवारी सायंकाळी घरातून गायब झाल्यावर ते कदाचित अतिरेक्यांना जाऊन मिळाले असावेत या शंकेने कुटुंबीयांनी लगेच पोलिसांत फिर्यादही नोंदविली होती.लपून बसलेल्या जागेवरूनच प्राध्यापक भट यांनी आपले वडील फैयाज अहमद भट यांना फोन करून ‘मी आता अल्लाला प्यारा होणार आहे. काही चुकले असल्यास माफ करा’ असे सांगितले. गराडा घातलेले सुरक्षा दलांचे अधिकारी चकमकीच्या जागेतून बाहेर जाणारे टेलिफोन ‘मॉनिटर’ करीतच होते. भट यांनी केलेल्या फोनवरून तेही अतिरेक्यांमध्ये असल्याची पोलिसांना खात्री होती. पोलीस भट यांच्या घरी गेले व कुटुंबीयांनी भट यांना शरण येण्याचे आवाहन करावे यासाठी त्यांचे वडील, आई व पत्नीला सोबत घेऊन निघाले. काही झाले तरी तो शस्त्र हाती घेणार नाही, अशी वडिलांनी पोलिसांना खात्री दिली. मात्र, १८ किमीपर्यंत ते पोहोेचले व पोलिसांच्या वायरलेसवरून रफी चकमकीत मारला गेल्याची बातमी आली. (वृत्तसंस्था)पूर्वीपासूनच अतिरेकी प्रवृत्तीमारल्या गेलेल्या प्राध्यापक भट यांचा अतिरेकी कल पूर्वीही दिसून आला होता. काश्मीरवर अन्याय होतो म्हणून त्याच्या वडिलांनाही बंडखोरांबद्दल सहानुभूती होती, पण त्यांनी कधी उघडपणे सरकारविरोधी कारवाया केल्या नाहीत. १८ वर्षांचे असताना मोहम्मद रफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेले होते. घरच्या लोकांनी त्यांना मन वळवून परत आणले. पुढे ते पी.एचडीपर्यंत शिकले, प्राध्यापक झाले व त्यांचे लग्नही झाले. तरी मूळ पिंड गेला नाही.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान