शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

नियमित रोजगारांतून अत्यंत तुटपुंजे वेतन; भारत पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 06:22 IST

१२ टक्के कामगारांना ५ हजारांपेक्षा कमी पगार

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश नियमित रोजगारांतून (रेग्युलर जॉब) अत्यंत तुटपुंजे वेतन मिळत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण-२0१७-१८ (पीएलएफ)नुसार, देशातील ६१ टक्के कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागते तसेच १७.८ टक्के तरुण (वय १५ ते २९ वर्षे) बेरोजगार आहेत.पीएलएफ सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, २0११-१२ आणि २0१७-१८ या काळात नियमित वेतनधारी रोजगारांत ५ टक्के वाढ झाली आहे. तथापि, याच काळात नोटाबंदीमुळे ४ टक्के रोजगार कमीही झाले आहेत. याचाच अर्थ प्रत्यक्ष रोजगारातील वाढ १ टक्काच आहे.वेतनधारी अथवा नियमित रोजगाराच्या प्रमाणाच्या बाबतीत चीन (५३.१ टक्के), ब्राझिल (६७.७ टक्के), दक्षिण आफ्रिका (८४.८ टक्के) या उदयोन्मुख देशांच्या तुलनेत भारत खूपच पिछाडीवर आहे. अहवालात म्हटले आहे की, २0१७-१८ मध्ये भारतातील ४५ टक्के नियमित कामगारांना (रेग्युलर वर्कर) दरमहा १० हजार रुपयांपेक्षाही कमी वेतन मिळते. १२ टक्के कामगारांना तर दरमहा ५ हजारांपेक्षाही कमी वेतन मिळते. ६३ टक्के नियमित महिला कामगारांना १० हजारांपेक्षा कमी, तर ३२ टक्के कामगारांना ५ हजारांपेक्षा कमी मासिक वेतन मिळते. ग्रामीण भागात स्थिती अशीच काहीशी आहे. ५५ टक्के नियमित कामगारांना १० हजारांपेक्षा कमी वेतन मिळते. शहरी भागात त्यांचे प्रमाण ३८ टक्के आहे.७२ टक्के लोकांना किमान वेतनही नाहीअहवालात म्हटले आहे की, सातव्या वेतन आयोगाने नियमित वेतनधारी कामगाराचे किमान मासिक वेतन १८ हजार रुपये निश्चित केले आहे. मात्र देशातील एकूण ७२ टक्के नियमित कामगारांना त्यापेक्षा कमी वेतन मिळते.५0 हजार ते १ लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळविणाऱ्या नियमित कामगारांची संख्या अवघी ३ टक्के आहे. १ लाखापेक्षा जास्त मासिक वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तर केवळ 0.२ टक्केच आहे.