शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नियमित रोजगारांतून अत्यंत तुटपुंजे वेतन; भारत पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 06:22 IST

१२ टक्के कामगारांना ५ हजारांपेक्षा कमी पगार

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश नियमित रोजगारांतून (रेग्युलर जॉब) अत्यंत तुटपुंजे वेतन मिळत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण-२0१७-१८ (पीएलएफ)नुसार, देशातील ६१ टक्के कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागते तसेच १७.८ टक्के तरुण (वय १५ ते २९ वर्षे) बेरोजगार आहेत.पीएलएफ सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, २0११-१२ आणि २0१७-१८ या काळात नियमित वेतनधारी रोजगारांत ५ टक्के वाढ झाली आहे. तथापि, याच काळात नोटाबंदीमुळे ४ टक्के रोजगार कमीही झाले आहेत. याचाच अर्थ प्रत्यक्ष रोजगारातील वाढ १ टक्काच आहे.वेतनधारी अथवा नियमित रोजगाराच्या प्रमाणाच्या बाबतीत चीन (५३.१ टक्के), ब्राझिल (६७.७ टक्के), दक्षिण आफ्रिका (८४.८ टक्के) या उदयोन्मुख देशांच्या तुलनेत भारत खूपच पिछाडीवर आहे. अहवालात म्हटले आहे की, २0१७-१८ मध्ये भारतातील ४५ टक्के नियमित कामगारांना (रेग्युलर वर्कर) दरमहा १० हजार रुपयांपेक्षाही कमी वेतन मिळते. १२ टक्के कामगारांना तर दरमहा ५ हजारांपेक्षाही कमी वेतन मिळते. ६३ टक्के नियमित महिला कामगारांना १० हजारांपेक्षा कमी, तर ३२ टक्के कामगारांना ५ हजारांपेक्षा कमी मासिक वेतन मिळते. ग्रामीण भागात स्थिती अशीच काहीशी आहे. ५५ टक्के नियमित कामगारांना १० हजारांपेक्षा कमी वेतन मिळते. शहरी भागात त्यांचे प्रमाण ३८ टक्के आहे.७२ टक्के लोकांना किमान वेतनही नाहीअहवालात म्हटले आहे की, सातव्या वेतन आयोगाने नियमित वेतनधारी कामगाराचे किमान मासिक वेतन १८ हजार रुपये निश्चित केले आहे. मात्र देशातील एकूण ७२ टक्के नियमित कामगारांना त्यापेक्षा कमी वेतन मिळते.५0 हजार ते १ लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळविणाऱ्या नियमित कामगारांची संख्या अवघी ३ टक्के आहे. १ लाखापेक्षा जास्त मासिक वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तर केवळ 0.२ टक्केच आहे.