शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ईशान्य भारतात पूरस्थिती गंभीर: भीषण पुरामुळे आसाम, मेघालयमध्ये आणखी १२ मृत्यू, ४० लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 09:33 IST

Flood in North East: ईशान्येकडील भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसाम आणि मेघालयमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये आणखी १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४३ वर पाेहाेचला आहे.

गुवाहाटी: ईशान्येकडील भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसाम आणि मेघालयमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये आणखी १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४३ वर पाेहाेचला आहे. दाेन्ही राज्यांमध्ये सुमारे ४० लाख नागरिक प्रभावित झाले असून पूर स्थितीत सुधारणा हाेण्याचे कुठलेही संकेत नाहीत.

आसाम आणि मेघालयमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. आसाममधील २८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. बचाव कार्यात एनडीआरएफच्या मदतीला लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. आसाममध्ये सुमारे १.५ लाखांहून अधिक लाेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गुवाहाटीमध्ये शनिवारच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. पाऊस आणि पुराचे पाणी अनेक ठिकाणी शिरल्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. काही रस्ते वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. त्रिपुरामध्ये काहीशी सुधारणा दिसून येत आहे. पावसाचा जाेर कमी झाल्यामुळे पाणीपातळीत घट हाेत आहे.

ड्राेनद्वारे पूरस्थितीचा घेणार आढावाआसाममधील पूर स्थितीचा आढावा घेण्यासाठी ड्राेनची मदत घेण्यात येणार आहे. आयआयटी गुवाहाटीने विकसित केलेल्या ड्राेनचा यासाठी वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने संस्थेला संपर्क केला आहे. सर्वाधिक फटका असलेला परिसर आणि संपर्क तुटलेल्या गावांचा आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने ड्राेनचा वापर करण्यात येणार आहे.मध्य प्रदेशात काेसळधारा- मध्य प्रदेशमध्येही मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. भाेपाळ, जबलपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. - राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

राजस्थानात पूर्व माेसमी पावसाने दाणादाणराजस्थानला पूर्व माेसमी पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मान्सूनचे आगमन हाेण्यापूर्वीच काही नदी आणि नाल्यांना पूर आला आहे. जयपूरसह श्रीगंगानगर, हनुमानगड, जोधपूरसह १५ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :floodपूरAssamआसाम